
राम मंदिर
वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या परिसरात काही चमत्कारीक घटना पाहिल्या. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याने या ठिकाणी रामाचं मंदिर (Ram Mandir) बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आले आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली. तीच बाबरी मशीद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता. नंतर ही मशीदही पाडल्या गेली. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. अखेर कोर्टाने वादग्रस्त जागेवर राम मंदिरच असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचं काम सुरू होऊन पूर्ण झालं आहे.
Stampede In Mahakumbh: अयोध्येतही कोट्यवधी भाविक, प्रयागराज महाकुंभासारखी परिस्थिती, राम मंदिर ट्रस्टला करावे लागले न येण्यासाठी अपील
Stampede In Mahakumbh: सध्या अयोध्येजवळ राहणाऱ्या भाविकांनी राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येत येणे टाळावे. त्यांनी शक्य असल्यास 15-20 दिवसांनी बसंत पंचमीनंतर अयोध्येत येण्याचे नियोजन करावे. कारण एका दिवसात करोडो भाविकांना रामललाचे दर्शन देणे अत्यंत अवघड आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Jan 29, 2025
- 9:46 am
अयोध्या राम मंदिराची कडक सुरक्षा व्यवस्था भेदली, असा कॅमेऱ्यांचा वापर करत…
Ayodhya Ram Mandir Security Lapse: अयोध्यातील राम मंदिराची सुरक्षा उत्तर प्रदेश सरकारने स्पेशल सिक्योरिटी फोर्सकडे दिली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे पोलीस आणि जवान आहेत. यापूर्वी ही सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफच्या सहा बटालियन आणि पीएसीच्या १२ कंपन्यांकडे होती.
- Jitendra Zavar
- Updated on: Jan 7, 2025
- 12:36 pm
Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजारीस किती आहे वेतन, कधीकाळी 100 रुपये होता पगार
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरात आचार्य सत्येंद्र दास मुख्य पुजारी आहेत. त्यांच्यासह अन्य 13 पुजारी मंदिरात सेवा देत आहे. नुकतेच नऊ नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती मंदिरात करण्यात आली. रामललाची मूर्ती टेंटमध्ये विराजमान असतानापासून आचार्य सत्येंद्र दास पुजारी म्हणून भगवतांची पूजा-अर्चना करत आहेत.
- Jitendra Zavar
- Updated on: Dec 22, 2024
- 2:15 pm
Ayodhya Diwali: अयोध्येत 500 वर्षांनंतर अशी दिवाळी…, 28 लाख दीपोत्सवाने सजणार घाट, असे असतील सर्व कार्यक्रम
ayodhya diwali 2024: अयोध्येतील उत्सावाच्या वातावरणात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहे. अयोध्येतील 17 मार्ग सामान्य जनतेसाठी बंद केले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Oct 30, 2024
- 10:54 am
राम मंदिराच्या केसचा निकाल देताना काय विचार केला? चंद्रचूड म्हणाले, देवासमोर बसून…
Dhananjaya Chandrachud on Ayodhya Case Judgement : भारताच्या सर्वोच्च न्यायानयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राम मंदिराच्या जागेच्या निकालाबद्दल मत व्यक्त केलं. पुण्यातील खेडमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड बोलत होते. त्यांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर...
- आयेशा सय्यद
- Updated on: Oct 20, 2024
- 3:18 pm
Ayodhya Verdict Result: अयोध्याचा निकाल देण्यापूर्वी देवा पुढे बसलो अन्… सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितला तो किस्सा
Dhananjaya Yeshwant Chandrachud in pune: मी परंपरेमुळे नियमित पूजा करतो. अनेक वेळा कोर्टात काम करताना पर्याय सूचत नाही. जेव्हा अयोध्येच काम माझ्या पुढे आले, त्यावेळी आम्ही तीन महिने अयोध्या प्रकरणावर विचार करत होतो. शेकडो वर्ष अयोध्या प्रकरणावर मार्ग सापडले नव्हता. ते काम आमच्यासमोर आले होते.
- Jitendra Zavar
- Updated on: Oct 21, 2024
- 10:10 am
अयोध्येतील रामलीलाचा विक्रम, 41 कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिली रामलीला
Ayodhya Ramlila: रामलीलाचे 26 भाषांमध्ये लाईव्ह प्रसारण होते. दूरदर्शन-यूट्यूबसह अन्य सोशल प्लेटफॉर्मवर रामलिला दाखवली जाते. रामभक्त घरीबसून भगवान रामची गाथा पाहतात.
- Jitendra Zavar
- Updated on: Oct 7, 2024
- 11:22 am
अयोध्या राम मंदिराचे काम मंद गतीने, निर्मितीची कामे रेंगाळण्याचे कारण आले समोर
ayodhya ram mandir news: अयोध्येतील हवामानामुळे कामगारही येथून निघून गेल्याचे मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, 'एल अँड टी कंपनीला मजुरांना परत आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच डिसेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणे अशक्य नाही.
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 31, 2024
- 8:45 am
राम मंदिर संकुलात शेषावतार मंदिर, आराखडा तयार, काय आहे खास घ्या जाणून
श्री रामजन्मभूमी संकुलात बांधल्या जाणाऱ्या शेषावतार मंदिराचे नवे रेखाचित्र आणि डिझाइन तयार करण्यात आले आहे. भूमिपूजनानंतर बांधकामाला सुरुवात झाली आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 29, 2024
- 10:39 pm
‘उद्धव ठाकरे सोबत विश्वासघात, धोका देणारे सच्चे हिंदू नाहीत…’, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास विरोध करणाऱ्या शंकराचार्यांचा हल्ला
Swami Avimukteshwaranand Saraswati: मातोश्रीवर पोहचल्यानंतर शंकराचार्य यांचे स्वागत संपूर्ण ठाकरे परिवाराने केले. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे माहीत आहे. ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात?
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 16, 2024
- 7:26 am
अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरे यांना भेटणार
Swami Avimukteshwaranand Saraswati: नेहमी वादात राहणारे उत्तराखंड ज्योतिष पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद १५ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 15, 2024
- 11:31 am
राम भक्तांसाठी खुशखबर, आता रामललासोबत घेता येणार सेल्फी
अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू राम विराजमान झाले. भक्तांचा ओघ सुरु झाला. राम मंदिर भक्तांसाठी खुले झाले आणि राम मंदिरात मोबाईल घेऊन जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली. मात्र, हळूहळू सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 5, 2024
- 10:18 pm
‘लोहपुरूष’ ते ‘पुराणपुरूष’, आता मागे फिरणे नाही, लालकृष्ण अडवाणी यांनी 8 वर्षात दिला 3 वेळा राजीनामा…
आमचे बहुतेक नेते आता फक्त त्यांच्या वैयक्तिक अजेंडांबद्दल चिंतित आहेत. त्यामुळे पक्षाच्या तीन प्रमुख व्यासपीठांचा म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणी, संसदीय मंडळ आणि निवडणूक समिती यांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे माझे राजीनामा पत्र मानले जाऊ शकते.
- Mahesh Pawar
- Updated on: Jun 30, 2024
- 6:22 pm
Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या छताला गळती का? निर्माण समितीने सांगितलं सत्य
Ram Mandir : मंदिराच्या छतामधून पाणी गळती होतेय असा दावा राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येन्द्र दास यांनी सोमवारी केला. त्यावर आता मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलय. मंदिराच्या छतामधून पाणी का आणि कस गळतय? त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलय.
- Dinananth Parab
- Updated on: Jun 25, 2024
- 12:22 pm
पहिल्याच पावसात अयोध्येच्या राम मंदिराला गळती
"राम मंदिराचं बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण झालं तर आनंदच आहे. पण जिथे रामलल्ला विराजमान आहेत, तसेच त्यापुढे जे बांधकाम झालं आहे तिथे पहिल्याच पावसात गळती होत आहे", अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे.
- Chetan Patil
- Updated on: Jun 24, 2024
- 10:59 pm