विराटने इशाऱ्यांमध्ये सांगितलं भावी कर्णधाराचं नाव, विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात कोहली भावूक

भारताने नामिबीयाविरुद्धचा अखेरचा सामना जिंकत विश्वचषक स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. पण आता यानंतर विराट कदाचित कधीच भारतीय टी20 संघाचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार नाही.

| Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 09, 2021 | 10:37 AM
1 / 5
टीम इंडियाचा पुढील कर्णधार कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच हवं आहे. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान विश्वचषकातील शेवटच्या सामन्यावेळी विराटने इशाऱ्यांमध्ये पुढील कर्णधाराचं नाव सांगितलं आहे.

टीम इंडियाचा पुढील कर्णधार कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच हवं आहे. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान विश्वचषकातील शेवटच्या सामन्यावेळी विराटने इशाऱ्यांमध्ये पुढील कर्णधाराचं नाव सांगितलं आहे.

2 / 5

विराट कोहली

3 / 5

पुढे बोलताना विराट म्हणाला,'टीमने ज्याप्रमाणे खेळ दाखवला आहे मला त्यावर गर्व आहे. पण इतरांना संधी देण्यासाठी मी बाजूना होणार आहे. संघात रोहित बराच काळ असून त्याने सर्व जवळून पाहिलं आहे.' विराटच्या या वाक्यातूनच विराटचं पुढील कर्णधार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

4 / 5

विराटने सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर निराशा व्यक्त केली. कारण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला नाणेफेक न जिंकल्यामुळे खूप तोटा सहन करावा लागला होता. विराटने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकता यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

5 / 5

रवी शास्त्री यांनीही कोच पदाचा राजीनामा दिला असून आता राहुल द्रविड ही जागा घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us