PAK vs AFG: टीम इंडियाच आशिया कपच स्वप्न भंगणार? पाकने अफगाणिस्तानला कमी धावसंख्येवर रोखलं

PAK vs AFG: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंडमध्ये आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा सामना सुरु आहे. फायनलचा मार्ग सोपा करण्यासाठी आज दोन्ही टीम्सना विजय मिळवणं आवश्यक आहे.

PAK vs AFG: टीम इंडियाच आशिया कपच स्वप्न भंगणार? पाकने अफगाणिस्तानला कमी धावसंख्येवर रोखलं
Pak vs Afg
Image Credit source: pcb twitter
| Updated on: Sep 07, 2022 | 9:05 PM

मुंबई: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंडमध्ये आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा सामना सुरु आहे. फायनलचा मार्ग सोपा करण्यासाठी आज दोन्ही टीम्सना विजय मिळवणं आवश्यक आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने आज टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान-अफगाणिस्तान इतकाच आजचा सामना टीम इंडियासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे.

टीम इंडियासाठी सामना का महत्त्वाचा?

तुम्ही म्हणाल टीम इंडियाचा काय संबंध? खरंतर टीम इंडिया काल श्रीलंकेविरुद्ध जिंकली असती, तर आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा नसता. पण सुपर 4 राऊंडच्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. आधी पाकिस्तान नंतर श्रीलंकेने पराभूत केलं. या स्पर्धेतील टीम इंडियाच आव्हान जवळपास संपुष्टात आलय.

हा सर्व जर-तरचा खेळ

आजच्या सामन्यात काही चमत्कार घडला, तर टीम इंडियाच आशिया कपमधील आव्हान जिवंत राहील. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते आज अफगाणिस्तानच्या विजयाची प्रार्थना करत आहेत. अफगाणिस्तानने पाकिस्तानला नमवणं आवश्यक आहे. पण पाकिस्तानचा संघ जिंकला, तर भारतासाठी दरवाजे बंद होती. हा सर्व जर-तरचा खेळ आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिलं हे लक्ष्य

दरम्यान अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 129 धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरानने सर्वाधिक 35 धावा केल्या. अन्य फलंदाज मोठी खेळी करु शकले नाहीत.