Team India : भारताविरुद्ध लिटनचा झंझावात, पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरु

| Updated on: Nov 02, 2022 | 5:10 PM

आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाची धावसंख्या अधिक आहे.

Team India : भारताविरुद्ध लिटनचा झंझावात, पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरु
virat kohli
Image Credit source: twitter
Follow us on

मेलबर्न : टीम इंडियाने (Team India) फलंदाजांनी चांगली खेळी केल्यामुळे मोठी धावसंख्या (Score) टीमला उभारता आली. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या केएल राहूल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव या तीन फलंदाजांनी चांगली खेळी त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 184 इतकी झाली. विशेष म्हणजे टीम इंडियाला अद्याप बांगलादेशच्या (Bangladesh) एकाही खेळाडूला बाद करता आलेलं नाही. त्यामुळे बांगलादेशची धावसंख्या सात ओव्हरमध्ये 66 इतकी झाली आहे.

आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाची धावसंख्या अधिक आहे. तरी बांगलादेशच्या फलंदाजांची चांगली खेळी केल्यामुळे आजच्या मॅचमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या तिथं पाऊस सुरु झाल्यामुळे काहीवेळ खेळ थांबला आहे. मैदानावर यंत्राच्या साहाय्याने पाणी हटवण्याचे काम सुरु आहे.