AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण…

खेड पंचायत समितीच्या निवडणूक निकालाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने दमदार कामगिरी केल आहे.

अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण...
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 09, 2026 | 8:08 PM
Share

Khed Panchayat Samiti Election Result : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धूम चालू होती. 7 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. तर आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. 12 जिल्हापरिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पक्षानेही चांगली कामगिरी केली आहे. परंतु संपूर्ण जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालामध्ये राज्यात एका पंचायत समितीच्या निकालाची राज्यभरात चर्चा होत आहे. या पंचायत समितीवर ठाकरे गटाने विजयाची मशाल पेटवली आहे.

नेमकी का चर्चा होतेय?

राज्यभरात पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या निकालाची चर्चा होत आहे. या पंचायत समितीवर टाकरे गटाने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. येथे एकूण 16 जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी तब्बल 12 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. खास बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने एकूण पाच जागांवर बाजी मारली आहे.

गड आला पण सिंह गेला

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. ते खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार आहेत. काहीही झालं तरी पंचायत समिती हातातून जायला नको यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांची भगिनी राजश्री जैद यादेखील उभ्या होत्या. बाबाजी काळे यांच्या उमेदवारांनी पंचायत समितीवर विजय मिळवला आहे. परंतु त्यांच्या भगिनीचा मात्र पराभव झाला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती तेथे झाली आहे.

भाजपा, शिंदे गटाने जोर लावला पण…

खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी तेथील भाजपा, शिंदे गटाने खूप जोर लावला होता. अनेक बड्या नेत्यांनी येथे सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे खेड तालुक्यात कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाली नव्हती. असे असूनही बाबाजी काळे यांनी एकहाती किल्ला लढवत ठाकरे गटाला विजय मिळवून दिला. खेडची पंचायत समिती जिंकल्यामुळे ठाकरे गटाने पुण्यात आपली पाळंमुळं रुजवायला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?