आम्ही येत नसतो, जा काय करायचं ते करा…पाकड्यांनी भारताला पुन्हा दाखवला माज, काय घडलं?
Pakistan Hockey Team: पाकिस्तानने आपला पुरुष हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एक मोठाल निर्णय घेतला आहे ज्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

पाकिस्तानने आपला पुरुष हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाठवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाने (PHF) आशियाई हॉकी महासंघाला (AHCF) संपूर्ण किंवा स्पर्धेचा काही सामने तटस्थ ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाने (PHF) म्हटले आहे की, “पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा सहभाग सुरळीत आणि पूर्ण व्हावा यासाठी त्यांना तटस्थ ठिकाण हवे आहे. संपूर्ण स्पर्धा किंवा पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे.”
अध्यक्ष मोहिउद्दीन अहमद वानी यांनी निवेदनात म्हटले आहे, “पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सध्याची संवेदनशील द्विपक्षीय परिस्थिती आणि सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि अनुकूल वातावरण सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे. ” पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक स्तरावर हॉकीच्या प्रचारासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
वानी म्हणाले, “आम्ही भारतासह सर्व एफआयएच सदस्य देशांचा मैदानावर सामना करण्यास तयार आहोत आणि खेळाला राजकारणापासून मुक्त ठेवण्याच्या तत्त्वासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्हाला प्रामाणिकपणे आशा आहे की, आशियाई हॉकी महासंघ स्पर्धेत पाकिस्तानचा सुरळीत आणि पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तटस्थ स्थळाच्या आमच्या सन्माननीय प्रस्तावावर सकारात्मक विचार करेल.”
पीएचएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, सरकारने राष्ट्रीय संघाच्या भारत दौऱ्याला मंजुरी दिलेली नाही, यानंतर काही तासांतच ही घडामोड समोर आली आहे. हे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दाव्याच्या विरोधात आहे. मान यांनी, हॉकी इंडियाचे सचिव भोला नाथ सिंग यांच्यासह, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या सहभागाची पुष्टी केली होती. त्यांनी यावर जोर दिला होता की, भारताचे क्रीडा धोरण पाकिस्तानला देशात आयोजित बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देते. सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत पाकिस्तानने गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये झालेल्या एफआयएच ज्युनियर विश्वचषक आणि आशिया चषकातूनही माघार घेतली होती.