Smriti Mandhana: मला तेव्हा खूप रडू आलं…. स्मृती मानधनाच्या विधानाची चर्चा, असं का म्हणाली?
Smriti Mandhana On Bad Experince: स्मृती मंधानाने तिच्या वाईट अनुभवाबद्दल एक विधान केले आहे ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

Smriti Mandha Latest News: स्मृती मंधानाचे गेल्या वर्षीच्या अखेरीस पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होते. मात्र, विविध कारणांमुळे हे नाते तुटले. तेव्हापासून, स्मृतीने या विषयावर उघडपणे चर्चा केलेली नाही. एका पॉडकास्टमध्ये, “जेव्हा शोचे सूत्रसंचालक राज शमानी यांनी तिला तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्रीबद्दल विचारले, तेव्हा ती शांत राहिली. तिला फक्त क्रिकेटशी संबंधित बाबींबद्दल बोलायचे आहे.”
शमानीने विचारले, “तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र कोणती होती?” त्यानंतर मंधाना काही क्षण शांत राहिली. जणू काही ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. मग ती थोडक्यात म्हणाली, “कदाचित विश्वचषक,” पण तिने कोणत्याही विशिष्ट स्पर्धेचे किंवा सामन्याचे नाव घेतले नाही.
संभाषणादरम्यान, तिने आपल्या भावनिक पैलूंवर चर्चा करणे टाळले आणि सांगितले की ती फक्त क्रिकेटबद्दलच बोलेल. कोविड-१९ चा काळ तिच्या आयुष्यातील खूप कठीण काळ होता. लोकांना फक्त तिच्याकडे पाहून कदाचित कळणार नाही की तिच्यात खूप राग आहे. पण तिने हे स्पष्ट केले की तिचा सूडावर विश्वास नाही.”
ती म्हणाली, “माझे कोणाशीही विशेष नाते नाही. पण मला खूप राग येतो. तो राग असा असतो की, ‘माझ्याशी पंगा घेऊ नका,’ जोपर्यंत मी तुमच्या मार्गात येत नाही. तोपर्यंत माझ्या मार्गात येऊ नका. मी सूड घेणार नाही. पण मी विसरणारही नाही. मात्र, मी कोणाशीही वाईट वागणार नाही.”
राज शमानीने विचारले की, शेवटचं कधी रडली होती? तेव्हा स्मृतीने चांगला प्रश्न म्हणत हलक्यात उत्तर दिले. मला बहुतेक काही आठवत नाही. बहुतेकवेळेला मी सिनेमा पाहिल्यावर रडते. मी माझ्या आयुष्यावर कधीच रडत बसली नाही. आत्ता मी मुसाफिर कॅफे पाहिली, तेव्हा मला रडायला आले होते. जे लोकांना भुष्काळातून शिकतात त्यांना मागील गोष्टींचा पश्चाताप होत नाही. जर तुम्ही त्याच गोष्टी धरून रडत बसलात तर त्यातून काहीच शिकायला मिळणार नाही? ” असेही स्मृती मानधना म्हणाली.