
मुंबईत असंख्य लोक मोठी स्वप्न घेऊन येतात. म्हणूनच या शहराला मायानगरी असं देखील म्हणतात. आज पाहायला गेलं तर अनेक मोठ्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईत आहेत… मुंबई लोकलवर मुंबईकरांचं आयुष्या आधारलेलं आहे… लाखो लोक रोज लोकलने प्रवास करत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. असं देखील म्हणतात की, एकदा मुंबईत आलेला व्यक्ती ही मायानगरी सोडण्याचा कधी विचारच करत नाही… म्हणून म्हणतात मुंबई सर्वांना आपलं करून घेते… आजा मुंबईज रोज कोट्यवधींचे व्यवहार होत असतात, म्हणून मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे… जगाच्या नकाशावर मुंबई फार महत्त्वाचं शहर आहे… आज मोठ-मोठ्या इमारतींनी भरलेली मुंबई पूर्वी म्हणजे 400 वर्षांपूर्वी कशी होती, कोणालाच माहिती नसेल…
सांगायचं झालं तर, एकवेळ अशी देखील होती, जेव्हा मुंबई एक छोटं गाव होतं. भारतात इंग्रज आल्यानंतर त्यांचं लक्ष या छोट्या गावावर पडलं आणि एक दिवस छोट्या दिसणाऱ्या गावाचं रुपांतर एका मोठ्या आणि संपन्न शहरात झालं… सध्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे 18 व्या शतकातील आहे… AI च्या मदतीने व्हिडीओ बनवण्यात आलाय. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील अवाक् व्हाल…
हे व्हिडिओ kaalchakra.bharat या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. व्हिडीओ पोस्ट करत असं सांगण्यात आलं आहे की, मुंबई होण्यापूर्वी शहराचं नाव बॉम्बे होते. येथे सात वेगवेगळी बेटे होती. खाड्या, खारफुटीची वने, दलदलीची जमीन आणि भरती-ओहोटीने विभागलेलं असं चित्र पूर्वी होतं. बॉम्बे बेट, कुलाबा, लिटल कुलाबा, मझगाव, परळ, माहीम आणि वरळी असे सात बेट होतं… 200 – 300 वर्षांपूर्वी हे बेट कसे होते… यांसारख्या रंजक गोष्टी व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडीओवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे… व्हिडीओ पाहिल्यानंतर जुन्या काळात गेल्याचा भास होत आहे… तेव्हा असलेली मुंबई आणि आताच्या मुंबईत मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे…