विरोधकांचे कोण-कोण जायचे ? खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात विरोधकांनी राजकारण करु नये. विरोधकांचे कोण जायचे याची माहिती आहे, आमच्याकडे, धरणाचे पाणी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने कॅबिनेट बैठकीत घेतला होता. याचीही चौकशी करु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नाशिकचे अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात अनेक महिलांवर अत्याचार झाला आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे अशा प्रकरणात महिला तक्रार करायला पुढे येत नाहीत. त्यांना धीर देऊन त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्या तक्रारी आधारे गुन्हे दाखल झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड आम्हीच केलेला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पुढे येऊन द्यावेत. परंतू उगाच राजकीय रंग देण्याचे काम करु नये. आता विरोधी पक्षाचे कोण-कोण येथे जायचे याचे पुरावे आमच्याकडे आहेत. म्हणजे पोलिस त्यावर काम करतच आहेत. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान साठी दारणा धरणातून पाणी आरक्षित कसे गेले. 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याची मंजुरी महाविकास आघाडी सरकारने कॅबिटने मिटींगमध्ये कशी घेतली याची चौकशी करता येईल. 31 जुलै 2020 रोजी यासाठीचा शासन निर्णय काढण्यात आला होता.त्यामुळे विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला. आपल्या तथाकथित शक्तीचा वापर करुन महिलाचं शोषण करणाऱ्याचा तपास आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्ही कोणालाही सोडणार नाही असाही इशारा फडणवीस यांनी विरोधकांनाही दिला आहे.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी

