#PulwamaAttack : देश विसरणार नाही तुमचं बलिदान! पुलवामात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

| Updated on: Feb 14, 2022 | 2:41 PM

Pulwama Martyr Day : 14 फेब्रुवारी म्हणजेच आज जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पुलवामा (Pulwama) हल्ल्याची तिसरी वर्षपूर्ती आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे (CRPF) 40 जवान शहीद झाले होते. ट्विटरवर #PulwamaAttack आणि #Pulwama_Martyr_Day ट्रेंड करत आहेत.

#PulwamaAttack : देश विसरणार नाही तुमचं बलिदान! पुलवामात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना सोशल मीडियावर श्रद्धांजली
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना सोशल मीडियावर श्रद्धांजली
Follow us on

Pulwama Martyr Day : 14 फेब्रुवारी म्हणजेच आज जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पुलवामा (Pulwama) हल्ल्याची तिसरी वर्षपूर्ती आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे (CRPF) 40 जवान शहीद झाले होते. मात्र, भारतीय वीरांचे हौतात्म्य व्यर्थ गेले नाही, कारण हल्ल्याच्या 12 दिवसांनंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी भूमीवर कार्यरत असलेले अनेक दहशतवादी तळ हवाई हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे देश आज स्मरण करत आहे. ट्विटरवर सकाळपासूनच #PulwamaAttack आणि #Pulwama_Martyr_Day ट्रेंड करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या शैलीत शूर आणि शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या हल्ल्याला ते विसरले नाहीत आणि माफ करणार नाहीत, असे लोक म्हणतात. तीन वर्षांनंतरही आठवणी ताज्या असून देशवासीय शहिदांचे स्मरण करीत आहे.

बलिदानाचे स्मरण

जम्मू-काश्मीरमधील या भ्याड दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती देशभर साजरी होत आहे. शहीद झालेल्या शूर जवानांच्या बलिदानाचे लोक स्मरण करत आहेत. काहींनी कवितेतून हुतात्म्यांना अभिवादन केले, तर काहींनी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देऊन राष्ट्रीय वीरांना आदरांजली वाहिली.

चंद्रशेखर राव यांनी उपस्थित केले होते प्रश्न

जेव्हा देश आपल्या शूर शहीदांना अभिवादन करत होता, तेव्हा तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. राहुल गांधींनी या प्रकरणी पुरावे मागून काहीही चुकीचे केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचा पुरावाही मी मागत आहे.

स्फोटकांनी भरलेली कार धडकली

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन सीआरपीएफचा 78 बसेसचा ताफा जात होता. हा ताफा पुलवामाला पोहोचला होता तेव्हा समोरून स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनाला धडकली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या प्राणघातक हल्ल्यात 40 शूर सीआरपीएफ जवान शहीद झाले.

आणखी वाचा :

Tribute to Lata Mangeshkar : रांगोळीतून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, 39 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेला ‘हा’ Video

Hijabनंतर आता आणखी एक Video Viral; यूझर्स म्हणतायत, जग जातंय पुढे भारत मात्र चाललाय मागे!

सेकंदाचा उशीर झाला असता तरी गेला असता जीव, महिला गार्डनं कसं वाचवलं मुलाला? पाहा थरारक Video