बृजभूषण यांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, महाराष्ट्रातूनही सिंह यांना पाठिंबा

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला पाठिंबा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातूनही बृजभूषण सिंह यांना पाठिंबा मिळत आहे. आमदार अबू आझमी यांनीही सिंह यांना फोन करून पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बृजभूषण यांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, महाराष्ट्रातूनही सिंह यांना पाठिंबा
| Updated on: May 09, 2022 | 6:48 PM

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 जून रोजी ते अयोध्येला (ayodhya) पोहोचणार आहेत. प्रभू श्रीराम सर्वांचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनाला कोणीही जाऊ शकतो, असं सांगत महाराष्ट्र भाजपने राज ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वागत केलं. पण भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदाराने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. बृजभूषण सिंह (brijbhushan singh) असं या भाजपच्या खासदाराचं नाव आहे. राज ठाकरे मिलिट्री घेऊन आले तरी त्यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही. आमच्या मृतदेहावरून राज यांना जावं लागेल, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. सिंह यांच्या या भूमिकेचं समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी स्वागत केलं आहे. एवढंच नव्हे तर आझमी यांनी थेट सिंह यांना फोन करून त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध होत असताना महाराष्ट्रातूनही या विरोधाला बळ मिळत असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.