“आम्ही हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपाने काय केलं?” , आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: रविवारी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची महायुती झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे ट्विटरवर नेमकं काय म्हणाले? यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jul 03, 2023 10:48 AM
Follow Us
Latest Videos
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती

