Dhananjay Munde Video : ‘अर्धवट ज्ञान अन् खोटं…’ दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंकडून खंडन अन् सडकून टीका
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान दमानियांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंनी खंडन केलंय. दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोटं प्रर्दशन असल्याचं मुंडेंनी म्हणत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावलेत. जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घ्या, असं देखील धनंजय मुंडे म्हणालेत. अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.शासनाच्या कार्य नियमावलीनुसार जीआर अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे. फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव, विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यतेस येत असते. मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी ही फाईल तपासतात आणि त्यानंतरच जीआर निर्गमित होतो. त्यामुळे खोटं बोलून जीआर काढला असं म्हणणं म्हणजेच निव्वळ हास्यास्पद आहे. मिडीया ट्रायल करणं आणि अर्धवट बुद्धीचं प्रदर्शन करणं असं हे असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

