अवकाळीने शेतकरी बेजार, पावसानं पिकांचं मोठं नुकसान बळीराजा हवालदिल
VIDEO | भंडारा जिल्ह्यात अवकाळीचा कहर, पावसामुळे धानपिकासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान, नुकसान भरपाईची बळीराजाकडून मागणी
भंडारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील जळगाव, नांदेड, अमरावती, बीड, नाशिक या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेलं पीकं अवकाळी पावसाने वाया गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरातून अवकाळी पावसामुळे धानपिकासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं मोठ नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे. भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरापासून सतत येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपिकासह बागायती शेतीचे प्रचंड नुकसान झालंय. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर अक्षरशः वांगी आणि इतर फळं शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाने त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Published on: May 01, 2023 02:47 PM
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
