India Alliance ची रॅली म्हणजे मुंबईकरांना टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर थेट म्हणाले…

VIDEO | महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली आहे. ‘मैं भी गांधी’ असं नाव या पदयात्रेला देण्यात आलंय, यावर शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर बघा व्हिडीओ

India Alliance ची रॅली म्हणजे मुंबईकरांना टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर थेट म्हणाले...
| Updated on: Oct 02, 2023 | 5:40 PM

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली आहे. ‘मैं भी गांधी’ असं नाव या पदयात्रेला देण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतील काँग्रेस कार्यालयाच्या इंडिया आघाडीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यादरम्यान, इतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. इंडिया आघाडीच्या या पदयात्रेसाठी वर्षा गायकवाड, सचिन अहिर आणि इतर नेते हजर होते. इंडिया आघाडीच्या या पदयात्रेवर शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. ‘इंडिया आघाडी हा बुरखा आहे. ती जुनीच युपीआय आहे. इंडिया आघाडीची रॅली निघते, त्याला काही अर्थ नाहीये. यापूर्वी अण्णा हजारेंनी देखील अशी रॅली काढली होते त्यावेळी त्यांच्या यात्रेत मैं भी गांधी असं टोपीवर लिहिलं होतं. पण नंतर काय झालं हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे नाव घ्यायचं. गांधीजीच्या नावाचा वापर करायचा आणि अशा रॅली काढायच्या त्याकाही अर्थ नाही.इंडिया आघाडी मुंबईकरांना टोपी लावतायत की नाही हे आम्ही सांगू शकणार नाही, पण तरी देखील जे काही घडतंय ते योग्य नाही’, असे केसरकर म्हणाले.

Follow us
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.