NAMO Shetkari Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्याला सरकारकडून मिळणार ‘इतके’ रूपये
VIDEO | राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्यास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रूपयांच्या निधीस शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रूपयांच्या निधीस शासनाकडून मान्यता मिळाली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरता पात्र असणाऱ्या शेतकऱ्याला राज्य सरकारकडून आता वर्षाला ६ हजार रूपये मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आजच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रूपये मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना यासंदर्भातील घोषणा केली होती.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

