अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर राष्ट्रवादीत हालचाली सुरू! प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या त्यांच्या खात्यांचा ताबा पुन्हा राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी हे पत्र दिले जाणार आहे. तसेच, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याबाबतही चर्चेची शक्यता आहे, ज्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीमागे दोन प्रमुख उद्देश होते. एक म्हणजे, अजित पवार यांच्याकडे असलेल्या तीन महत्त्वाच्या खात्यांचा ताबा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना एक अधिकृत पत्र सुपूर्द करणे. दुसरे, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासाठी कोण दावेदार असेल यावर चर्चा करणे. अजित पवारांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीबाबत तसेच राष्ट्रवादीच्या अंतर्गत स्थितीवरही विचारमंथन होण्याची शक्यता आहे.
Published on: Jan 30, 2026 01:06 PM
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
