Pandharpur : विठ्ठल-रुक्मिणी अभिषेकासाठी चंद्रभागेऐवजी गंगेचं पाणी, काय होतोय आरोप? महर्षी वाल्मिकी संघाची मागणी काय?
विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी चंद्रभागा नदीऐवजी गंगेचे पाणी वापरले जात असल्याचा आरोप महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे. चंद्रभागेचे पाणी डावलून मंदिर समितीने वारकऱ्यांचा अपमान केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी चंद्रभागा नदीचे पाणी वापरण्याऐवजी गंगेचे पाणी वापरले जात असल्याचा गंभीर आरोप महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे. या प्रकारामुळे मंदिर समितीने वारकरी भक्तांचा अपमान केला असून, ‘जेव्हा नव्हती गोदा-गंगा, तेव्हा होती चंद्रभागा’ या चंद्रभागेच्या ऐतिहासिक महत्त्वाकडे दुर्लक्ष केले आहे, असे अंकुशराव यांचे म्हणणे आहे. अंकुशराव यांनी मंदिर समितीच्या या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
चंद्रभागा नदी पुढे वाहत असताना, तिच्या पवित्र पाण्याची उपेक्षा करून दुसऱ्या नदीचे पाणी वापरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. त्यांनी मागणी केली आहे की, मंदिर समितीने लवकरात लवकर चंद्रभागेचे पाणी पूजा आणि अभिषेकासाठी वापरणे सुरू करावे. अन्यथा, या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. मंदिर समितीने यावर त्वरित कार्यवाही न केल्यास, समितीचे अधिकारी, कर्मचारी, अध्यक्ष आणि सहअध्यक्षांना चंद्रभागेचे पाणी घालून त्यांचा निषेध व्यक्त केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Published on: Oct 01, 2025 03:05 PM
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
