तेव्हा आमचा निवडणूक आयोगावर… ; संजय राऊतांचं मोठं विधान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निवडणूक आयोगातील अनियमिततांवर गंभीर आरोप केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निवडणूक आयोगातील अनियमिततांवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, शरद पवार यांनी काल एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. निवडणुकीपूर्वी काही व्यक्तींनी 160 जागा देण्याची ऑफर देत विविध रकमांची मागणी केली होती. अशाच प्रकारे आम्हालाही काही लोक भेटले, तसेच उद्धव ठाकरे यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी असे प्रस्ताव देणारे भेटले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळाले, आणि विधानसभेसाठीही 60-65 जागा जिंकण्याचे आश्वासन देण्यात आले. तेव्हा आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. आता राहुल गांधी यांनी मत चोरीचे पुरावे सादर केले असून, त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली.
राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, जबाबदारीने बोलतात आणि त्यांनी या प्रकरणी सखोल संशोधन केले आहे. त्यांनी सादर केलेल्या मत चोरीच्या पुराव्यांची अनेक पत्रकारांनी पडताळणी केली आहे. तरीही निवडणूक आयोग पुरावे मागत असल्यास, त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आणि तोंडात बोळा कोंबला आहे, असे दिसते. याविरोधात उद्या इंडिया आघाडीचा लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे. मतदारांना त्यांच्या मताची खात्री मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने व्हीव्हीपॅट व्यवस्था लागू झाली. मात्र, आता निवडणूक आयोग ही व्यवस्था नाकारत आहे. मग आमचे मत कुठे गेले, हे आम्हाला कसे कळणार, असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

