शिवरायांच्या अवमानावेळी शिंदेगट-भाजपचं तोंड गप्प का? संजय राऊत यांचा सवाल
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला सल्लाही दिलाय. पाहा...
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. काल मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चावरून राऊतांनी भाजपवर टीका केलीय. शिवरायांच्या अवमानावेळी आम्ही आंदोलनं केली. त्या विधानांना कडाडून विरोध केला. तेव्हा शिंदेगट-भाजपचं तोंड गप्प का होतं?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. हिंदूंचा खरा आक्रोश बघायचा असेल तर भाजप नेत्यांनी काश्मीरमध्ये जावं. काश्मीरी पंडितांची अवस्था बघावी. वास्तव समोर येईल, असं राऊत म्हणालेत.
Follow Us
Latest Videos
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
