डोळ्यात मिरची पावडर टाकली अन् कोयत्याने…; बिनविरोधासाठी खून? सोलापूरात नेमकं काय घडलं
सोलापुरात राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नातून हा संघर्ष वाढल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला आहे. या प्रकरणी भाजपच्या नगरसेविकेसह १५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, आमदारपुत्रावरही संशयाची सुई आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
सोलापुरात राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) विद्यार्थी सेनेचे प्रमुख बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ही घटना बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांमधून झालेल्या संघर्षातून घडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
भाजपकडून सोलापूरच्या प्रभाग क्रमांक दोनच्या ‘क’ वॉर्डात शालन शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर रेखा सरवदे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. नंतर रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर भाजपच्या शालन शिंदे यांच्या समर्थकांनी रेखा सरवदे यांच्या घरासमोर जल्लोष केल्याने बाळासाहेब सरवदे जाब विचारण्यासाठी गेले. याच वादातून त्यांना मिरची पूड टाकून कोयता, चाकू आणि गुप्तीने वार करण्यात आले. बाळासाहेब सरवदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी भाजपनेत्या शालन शिंदे यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये भाजपच्या विद्यमान नगरसेविकांचाही समावेश आहे. विरोधकांनी या हत्येमागे भाजपच्या ‘बिनविरोध’ राजकारणाचा हात असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला

