AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Puntamba : आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना नोटीसा, काय आहे शेतकऱ्यांचा आरोप?

राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यावर आंदोलन छेडले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्याता आले होते. असे असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे तर सरकराने दुर्लक्ष केलेच आहे शिवाय आंदोलकांनाच नोटीसा बजावल्या आहेत.

Puntamba : आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना नोटीसा, काय आहे शेतकऱ्यांचा आरोप?
पुणतांबा शेतकरी आंदोलन
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 01, 2022 | 2:32 PM
Share

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा येथे 1 जून रोजी 5 वर्षानंतर पुन्हा शेतकरी आंदोलनाला सुरवात झाली आहे. 5 दिवस हे (Dharna movement) धरणे आंदोलन होणार असताना पहिल्याच दिवशी हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले आहे. कारण बुधवारी सकाळी बळीराजाला दुग्धाभिषेक घालून आंदोलनाला सुरवात होताच अवघ्या काळात वेळात आंदोलनाचे नेते आणि पुणतांबा गावचे सरपंच धनंजय धनवटे यांच्यासह इतरांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांचे आंदोलन हे मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी पाच दिवसांमध्ये आणखीन काय घडामोडी घडणार हे पहावे लागणार आहे.

आंदोलनावर शेतकरी ठाम

राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यावर आंदोलन छेडले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्याता आले होते. असे असताना देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे तर सरकराने दुर्लक्ष केलेच आहे शिवाय आंदोलकांनाच नोटीसा बजावल्या आहेत. असे असले तरी 5 दिवस धरणे आंदोलन पारच पडणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.

पुणतांब्याच्या आंदोलनाला वेगेळेच महत्व

शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या घेऊन पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर मोठ्या सभामंडपात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु झाले आहे. आज आंदोलनाचा पहिला दिवस असला तरी पुढील काळात या ठिकाणी राज्यभरातून शेतकरी येणार आहेत. शिवाय 2017 साली येथूनच सुरु झालेले आंदोलन राज्यभऱ पसरले होते आणि या आंदोलनानंतर राज्य सरकारलाही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे येथील आंदोलनाला यश मिळतेच अशी धारणा झाली असून आता पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने कारवाईच्यान अनुशंगाने पावले उचलली आहेत.

या आंदोलकांना नोटीसा

पुणतांबा ग्रामपंचायतीच समोर बुधवारी सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरवात झाली होती. दरम्यान, दोन तासाचा आवधी जाताच गावचे सरपंच धनंजय धनवटे , सुहास वहाडणे , धनंजय जाधव , बाळासाहेब चव्हाण , सुभाष कुलकर्णी , सभाष वहाडणे या नेत्यांना सीआरपीसी १४९ अन्वये नोटीस बजावली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याचे कारण नोटीसीत नमुद करण्यात आले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये आम्ही आंदोलनावर ठाम असल्याची भुमिका आंदोलकांनी व्यक्त केलीय .

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?