आर्थिक मंदीमुळे मारुती सुझुकीमध्ये 3 हजार कर्मचाऱ्यांची कपात

मारुती सुझुकीने तब्बल 3 हजार कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केले नाहीत, अशी माहिती मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आरसी भार्गव यांनी मंगळवारी (27 ऑगस्ट) दिली.

आर्थिक मंदीमुळे मारुती सुझुकीमध्ये 3 हजार कर्मचाऱ्यांची कपात
| Edited By: | Updated on: Aug 28, 2019 | 9:18 AM

मुंबई : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) तब्बल 3 हजार कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू (Contract Renew) केले नाहीत, अशी माहिती मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आरसी भार्गव यांनी मंगळवारी (27 ऑगस्ट) दिली. मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे बऱ्याच कंपनीने आपली उत्पादने थांबवली आहेत.

“कारच्या किंमतीत टॅक्समुळे वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची खरेदी मंदावली आहे, असं कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर्स बैठकीत भार्गव यांनी सांगितले.

13 लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता

मंदीमुळे ऑटो कंपनींत आतापर्यंत 20 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. जर असे सुरु राहिले तर 13 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. जुलैमध्ये सलग 9 व्या महिन्यात गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे कंपनींनी आपली उत्पादन थांबवली आहेत.

ऑटो इंडस्ट्रीतील मंदीचे कारण

देशात वेगाने उपभोगाच्या वस्तूंच्या मागणीत घट होत आहे. जुलैमध्ये वाहन उत्पादन 17 टक्क्यांनी घटला आहे. NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनेन्शिअल इन्स्टीट्यूशन स्वत: आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे ऑटो डीलर्स आणि खरेदी करणाऱ्यांना कर्ज देऊ शकत नाहीये. त्यामुळे डीलरशीप बंद होत आहे. GST मध्ये झालेली वाढ, नोटबंदीमुळेही ऑटो इंडस्ट्रीमध्ये  मंदी आली आहे.

दरम्यान, देशात आलेल्या मंदीमुळे ऑटो इंडस्ट्रीशिवाय इतर क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. पारलेजी , ब्रिटानीया यांनीही आपल्या कंपनीतून अनेक कर्माचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. मंदीमुळे आणखी नोकऱ्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.