आर्थिक आणीबाणी आली तर असे रहा सावध

वेळ कधी कोणावर सांगून येत नाही. पैशाची गरज देखील कधीही भासू शकते. परंतु एकदम गरज असताना पैसे नसतील तर काय करावे हा प्रश्न पडतोच. त्यासाठी कोणते मार्ग आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा

आर्थिक आणीबाणी आली तर असे रहा सावध
shamal sawant | Updated on: Jan 12, 2023 | 5:48 PM

मुंबई : अचानक पैशाची गरज कोणालाही भासू शकते . अचानक आर्थिक नुकसान झाल्यास किंवा खर्चात वाढ झाल्यास फायनान्शियल रिस्क किंवा आर्थिक जोखीम म्हणता येईल. कधी गुंतवणुकीत नुकसान तर कधी पगारात घट होते परंतु खर्च काही कमी होत नाहीत. कोणतीही दुर्घटना , आजार अशा कोणत्याही प्रकारची जोखीम आली आणि बचत नसेल तर तणाव वाढतो.

 

कार अपघात झाला तर आपले रक्षण व्हावे यासाठी सीटबेल्ट लावतो. अशाप्रकारे आर्थिक जोखीमी अचानक आल्यास इमर्जन्सी फंड या सिटबेल्टचे काम करतात.

कमावण्यास सुरू केल्यानंतर सर्वात आधी पुढील 6 महिन्याच्या खर्चासाठी वेगळे पैसे काढून ठेऊन इमर्जन्सी फंड तयार करावा.

जर तुमचा पगार 55 हजार रुपये असेल तर त्यातून घरभाडे, कर्जाचा EMI , रेशन, मुलांच्या शिक्षणाची फी, कामवालीचा पगार , फोन बिल , सोसायटीचा मेंटेनंस हा सर्व खर्च 35 हजार रुपयांपर्यंत होत असेल, मनोरंजन किंवा बाहेर कधी खायचे झाल्यास, मुव्हीला जायचे असल्यास तर सर्व मिळून 5 हजार . हे सर्व खर्च होऊन तुमच्या हातात बचत म्हणून 10 हजार रूपये शिल्लक राहतात.

जर 40 हजार रुपये महिन्याचा खर्च झाल्यास 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड म्हणून तुम्हाला 2 लाख 40 हजार रुपये जमा करावे लागतील. 10 हजार महिना बचत होत असेल तर टार्गेट पूर्ण होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागेल.

यामध्ये देखील कोणतीही गुंतवणूक किंवा मोठा खर्च नाही केला तर.

इमर्जन्सी फंडाची रक्कम गुंतवण्याची चूक न करता जिथून लवकर काढता येतील अशा ठिकाणी ठेवा. यासाठी वेगळ्या बँकेत तुम्ही अकाऊंट सुरू करू शकता. फ्लेक्सीबल FD ज्यामध्ये पैसे कधीही ट्रान्सफर करू शकता, किंवा म्युच्युअल फंडबद्दल कल्पना असेल तर शॉर्ट टर्म डेट स्कीम हा पर्याय देखील आहे.

त्यामुळे कोणतीही आर्थिक आणीबाणी आल्यास इमर्जन्सी फंड असणे किती गरजेचे आहे . तर आता वेळ न घालवता लगेच इमर्जन्सी फंडसाठी काम सुरू करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us