
‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’, या म्हणीची भीती आता साखर कारखानदारीला वाटतं आहे. साखरेच्या जीवावर अनेकांचे संसार चालतात. चुल पेटते असे म्हणतात. अनेक भागातील सत्ताकारण, अर्थकारण, समाजकारण साखर कारखानदारीवर सुरू आहे. या उद्योगात अनेक आव्हानं आहेत, तशा संधी पण आहेत. इतक्या वर्षात या उद्योगाने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहीले आहेत. अनेक बदल पचवले आहेत. कारखानदारी जगवण्याचाच नाही तर वाढवण्याचाच प्रयत्न केला आहे. पण काही ठिकाणी कारखानदारीतील गोडवा हरवत चालल्याने केंद्राने या उद्योगात साखर पेरणी सुरू केली आहे. अर्थात ही पेरणी कायदेशीर आहे. साखर नियंत्रण आदेश 1966 मध्ये सुधारणा करण्याचा चंग सरकारने मनाशी बांधला आहे. या उद्योगावरील नियंत्रण घट्ट आणि कडक करण्यासाठी साखर नियंत्रण आदेश 2024 चा मसुदा आणला आहे. या प्रस्तावित दुरुस्तीने कारखानदारीवर केंद्र सरकारची एकाधिकारशाही येते की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. साखर कारखान्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आत्तापर्यंत साखर नियंत्रण आदेश 1966...