Global Recession: जागतिक मंदीच्या भीतीमुळे नोकऱ्यांवर परिणाम, ऑक्टोबरमध्ये मंदावली भरतीची प्रक्रिया

जागतिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नोकऱ्यांना फटका बसला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांचा खर्च देखील कमी केला आहे.

Global Recession: जागतिक मंदीच्या भीतीमुळे नोकऱ्यांवर परिणाम, ऑक्टोबरमध्ये मंदावली भरतीची प्रक्रिया
जागतिक मंदी
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 08, 2022 | 10:57 PM

मुंबई, जागतिक मंदीच्या (Global Recession) भीतीचा परिणाम नोकऱ्यांवर पाहायला मिळाला. नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यासाठी नोकरी देणार्‍या कंपन्यांनी सावधगिरी बाळगल्याने ऑक्टोबरमध्ये देशातील नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्ये 6 टक्क्यांनी घट झाली आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्स (MEI) नुसार, स्टार्टअप इकोसिस्टमचे बदलते स्वरूप, निधीच्या समस्या आणि मंदीची भीती यामुळे तिमाही आधारावर नियुक्ती क्रियाकलाप पाच टक्क्यांनी कमी झाला. खरं तर, नवीन कंपन्यांना आवश्यक निधी मिळत नाही आणि स्टार्टअप्स देखील आता खर्च कमी करण्यावर भर देत आहेत, त्यामुळे ते सध्या नवीन नोकऱ्यांबाबत सावध आहेत. तथापि, कंपन्यांची वाढ सुलभ करण्यासाठी अंतर्गत पुढाकार आणि सरकारी हस्तक्षेपांमुळे, येत्या काही महिन्यांत भर्ती क्रियाकलापांमध्ये तेजी येण्याची आशा आहे.

अहवालात काय विशेष आहे

मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्स हा खरंतर एजन्सीच्या भर्ती प्रक्रियेची माहिती देणारा मासिक निर्देशांक आहे. हे नोकऱ्यांच्या मागणीवर आधारित दर महिन्याला नोकर भरतीची गणना आणि विश्लेषण करते. अहवालात असे म्हटले आहे की, अनेक महिन्यांपासून नोकरीची जोरदार मागणी असूनही, सर्व उद्योगांमध्ये नोकऱ्यांमध्ये लक्षणीय मंदी आहे. दुसरीकडे, वाहन, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये नियुक्ती करण्याचे संकेत अपेक्षित आहेत.

याशिवाय, ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत BPO/ITES मधील भर्ती प्रक्रियांमध्ये 16 टक्के आणि मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील 24 टक्के घट झाली आहे. अहवालात नमूद केल्यानुसार वाढत्या मार्जिनचा दबाव, खर्च आणि महागाईमुळे आयटी क्षेत्रातील भर्ती प्रक्रियांमध्ये 19 टक्के घट झाली आहे.

कंपन्यांद्वारे खर्च कमी करण्याचा परिणाम

महागाई आणि  मंदीच्या भीतीमुळे कंपन्या आपला खर्च कमी करण्यावर भर देत आहेत. सध्या, बहुतेक कंपन्यांनी भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन विस्तार योजना पुढे ढकलली आहे. त्याच वेळी, तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये टाळेबंदी देखील दिसून आली. यावरून हे स्पष्ट झाले आहे की कंपन्या सध्या त्यांच्या खर्चावर मर्यादा घालण्याचा आग्रह धरत आहेत, त्याचा परिणाम नोकरभरतीवरही झाला आहे.