
पतंजली ही आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांची आघाडीची कंपनी आहे. ती केवळ आरोग्याच्या क्षेत्रातच नव्हे तर पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण स्थिरतेच्या क्षेत्रातही महत्त्वाचे काम करत आहे. ही संस्था पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अनेक हरित उपक्रमांवर काम करत आहे.
पतंजलीने वृक्षारोपण मोहीम राबवली आहे. जलसंधारण योजना सुरु केल्या आहेत. तसेच पर्यावरणपूरक उत्पादनांचा प्रचार करून निसर्ग संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. कंपनी जलशुद्धीकरण, पावसाचे पाणी साठवण आणि स्वच्छता मोहीम यासारख्या प्रयत्नांद्वारे नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याचे काम करत आहे.
पतंजली शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहीत करत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रगत बियाणे, सेंद्रिय खते आणि नैसर्गिक कीड व्यवस्थापन तंत्रे पुरवठा करत आहे. यामुळे शेत जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि कृषी उत्पादनांची गुणवत्ता सुधारते. पतंजलीकडून आपल्या उत्पादनांच्या निर्मितीमध्ये नैसर्गिक आणि सेंद्रिय घटकांचा वापर केले जाते. त्याचा पर्यावरणावर कमीतकमी परिणाम होता. कारखान्यांमध्ये ऊर्जेचा वापर कमी करणे आणि पाण्याचा अपव्यय व्यवस्थापन यावर पंतजलीने विशेष लक्ष दिले आहे.
पतंजली ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण आणि मदत पुरवते. याशिवाय, कंपनी आपत्ती निवारण कार्य, गो-आश्रय ऑपरेशन आणि स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहे. पतंजली आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय कृषी ज्ञानाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न पंतजलीकडून करण्यात येत आहे. ही संस्था भारतीय जीवनशैली आणि स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करून स्वावलंबी होण्यासाठी काम करत आहे. हरित उपक्रमांतर्गत पतंजली नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनावर भर देते. त्याची उत्पादने सेंद्रिय आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही.