ना परीक्षा ना मुलाखत थेट अर्ज करा आणि मिळवा रेल्वे विभागात नोकरी, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीच

| Updated on: Dec 10, 2023 | 10:01 AM

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधीच आहे. उशीर न करता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच आपला अर्ज हा दाखल करावा. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

ना परीक्षा ना मुलाखत थेट अर्ज करा आणि मिळवा रेल्वे विभागात नोकरी, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीच
Follow us on

मुंबई : रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ज्यांचे शिक्षण फार जास्त नाहीये, ते देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेला 11 डिसेंबरपासूनच सुरूवात झालीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा या भरती प्रक्रियेसाठी द्यायची नाहीये. फक्त परीक्षाच नाही तर कोणत्याही प्रकारची मुलाखत देखील घेतली जाणार नाहीये.

खरोखरच दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. उमेदवारांनी उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया 3000 हून अधिक पदांसाठी सुरू आहे.

रेल्वेकडून ही बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवार हा दहावी पास असला पाहिजे आणि संबंधित ट्रेड्समध्ये तो आयटीआय देखील पास असायला हवा. उत्तर रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया 11 डिसेंबरपासून सुरू आहे. इलेक्ट्रिशियन, पेंटर आणि टर्नर यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकत. या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. www.rrcnr.org या apprentice.rrcner.net वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेची सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल.

दहावीमध्ये कमीत कमी 50 टक्के मार्क उमेदवाराला असणे आवश्यक आहे. संबंधित ट्रेडचे ITI सर्टिफिकेट देखील महत्वाचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 24 असावे. अजिबात उशीर न करता उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधी तुमच्याकडे असणार आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज दाखल करू शकता.