Gujrat : काँग्रेस आमदाराच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना उडविले, 6 जणांचा मृत्यू

परिसरातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Gujrat : काँग्रेस आमदाराच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना उडविले, 6 जणांचा मृत्यू
काँग्रेस आमदारांच्या जावयाने मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना उडविले, 6 जणांचा मृत्यू
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 12, 2022 | 11:47 AM

गुजरात : गुजरातमधील (Gujrat)आणंद (Anand) जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. काँग्रेस आमदार पूनम परमार यांच्या जावयावर मद्यधुंद अवस्थेत गाडीने अनेकांना उडविले आहे. त्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील डाळी गावाजवळ झाला. विशेष म्हणजे गाडीचा चालक हा पूनम परमार यांचा जावाई असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये रक्षाबंधनासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि आईचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. चालकावरती रुग्णालयात उपचार सुरु असून तब्येत बरी झाल्यानंतर पोलिस चालकाला ताब्यात घेणार आहे.

काँग्रेस आमदाराच्या जावयावर आरोप

गाडीवर गुजरात आमदार असे लिहिले आहे. कार चालकावर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कार चालक हा काँग्रेस आमदाराचा जावई असल्याची माहिती समजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील डाळी गावाजवळ झाला. या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. रक्षाबंधनाचा सण साजरा करून कुटुंबीय परतत असताना आनंदच्या सोजित्राजवळ हा भीषण अपघात झाला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

परिसरातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मामाच्या घरी राखी बांधण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी आणि त्यांच्या आईचाही समावेश आहे. या प्रकरणी सोजित्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सदोष मनुष्यवधा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आनंदचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार आणंदमध्ये सायंकाळी 7 वाजता कार, दुचाकी आणि ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत सहा जण ठार झाले. ऑटोमधील चार जण आणि दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.