आसाराम बापूला कशी झाली होती अटक; आश्रम ते जेलच्या प्रवासाची ही गोष्ट…

| Updated on: Feb 03, 2023 | 9:22 PM

जोधपूर जेलमध्ये बंद आसारामची चर्चा पुन्हा सुरू झाली. गांधीनगर येथील कोर्टात आसारामला शारीरिक शोषण प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. आसारामची अटकही सीनेस्टाईलने झाली होती.

आसाराम बापूला कशी झाली होती अटक; आश्रम ते जेलच्या प्रवासाची ही गोष्ट...
आसाराम
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

जयपूर : सप्टेंबर २०१३ पर्यंत आसाराम बापूला (Asaram Bapu) देश संत म्हणून ओळखत होते. प्रवचन ऐकण्यासाठी लाखो लोकं येत. महिला, बालकं तसेच युवकंही त्यात राहत. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, आसाराम बापूला हात जोडत. २०१३ मध्ये शाहजहानपूर येथील एका बालिकेने आसाराम विरोधात दिल्लीत शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळ जोधपूर सांगितलं होतं. तत्कालीन डीएसपी अजय पाल लंबा यांनी प्रकरणाचा तपास केला. परंतु, धर्मगुरुला अटक करणे सोपे काम नव्हते. पोलिसांसमोर हे एक आव्हान होते. आसाराम बापूची अटक चित्रपटापेक्षा काही कमी थरारक घटना नव्हती.

आसाराम विरोधात शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला. भक्तांमध्ये खळबळ माजली. कारण देश-विदेशातही आसारामचे भक्त होते. आसारामलाही माहीत होत की, केव्हाही पोलीस आपल्याला अटक करतील. भक्तांच्या गराड्यात आसाराम राहू लागला.

२७ ऑगस्ट २०१३ ला जोधपूर पोलीस विचारपूस करण्यासाठी इंदौरला पोहचले. भक्तांनीही पोलिसांना घेराव करून नारेबाजी केली. दोन दिवस पोलीस इंदौरमध्ये राहिले. प्रवचनानंतर आसाराम आराम करायला गेला. तेव्हा पोलीस आसारामला ताब्यात घेतले

हजारोंच्या गर्दीत आसारामला अटक

इंदौर आश्रमापासून जोधपूरला पोहचणे कठीण होते. हजारो भक्ती आसारामला निर्दोष असल्याचे सांगत होते. विचारपूस केल्यानंतर ३१ ऑगस्ट २०१३ ला संध्याकाळी जोधपूर पोलिसांनी आसारामला अटक केली. अटकेनंतर आसारामचे वाईट दिवस सुरू झाले. काही अन्य महिलांनीही आसाराम विरोधात तक्रार दाखल केली.

जोधपूर पोलिसांनी आसाराम आणि त्याचा मुलगा साई यालाही अटक केली. २००१ ते २००६ पर्यंत आसाराम आणि त्याच्या मुलाने शारीरिक शोषण केल्याच्या तक्रारी होत्या.

धमक्यांचे सत्र, दबावतंत्र

आसाराम आणि त्याच्या मुलाच्या अटकेनंतर पोलीस, न्यायाधीश यांनाही धमक्या दिल्या गेल्या. जबाब बदलविण्यासाठी धमक्या दिल्या गेल्या. ज्या मुलीने तक्रार केली होती तिच्या पतीवर हल्ला करण्यात आला. पीडितेचे पती जखमी झाले होते.

आश्रमातील स्वयंपाकी अखिल गुप्ता यांनी आसाराम विरोधात जबाब दिला होता. अज्ञात आरोपींनी अखिल गुप्ता यांनी हत्या केली. आसारामचा खासगी डॉक्टर अमूर्त प्रजापतीला राजकोट येथे अज्ञात आरोपींनी ठार केले. कारण अमूर्त प्रजापती हेसुद्धा जबाब देणार होते.

मदतीला नामवंत वकील

देशातील नामवंत वकील सुब्रमण्यम स्वामी आणि रामजेठमलानी या वकिलांनी त्यांचा खटला चालविला. पण, आसारामला जामीन मिळाला नाही. बलात्काराच्या आरोपात आसारामचा मुलगा साई, सेवेदार शिवा, प्रकाश द्विवेदी, संचिता गुप्ता यांनाही अटक करण्यात आली होती.