Kalyan : कल्याणमध्ये तडीपारी आणि मोक्का कारवाईला वेग, दादा भाईंच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या, इतक्या जणांना घेतलं ताब्यात

| Updated on: May 11, 2023 | 10:30 AM

Crime news वर्षभरात 16 लोकांवर तडीपार, तर 8 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करत दादा भाईंच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या सगळ्या प्रकरणात कल्याण झोन 3 पोलीस संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी ऍक्शन मोडवर आहे. कारवाई होत असल्यामुळे भाईगिरी करणाऱ्यांना घाम फुटला आहे.

Kalyan : कल्याणमध्ये तडीपारी आणि मोक्का कारवाईला वेग, दादा भाईंच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या, इतक्या जणांना घेतलं ताब्यात
kolasewadi police station
Image Credit source: tv9marathi
Follow us on

कल्याण : कल्याण (Kalyan) पूर्वेत खुलेआम गुन्हेगारीमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे, हत्यार घेऊन लोकांना घाबरवणे, शस्त्र घेऊन फिरणे, तलवारी घेऊन दहशत माजवणे, हल्ला करणे, चोऱ्या करणे अशा एक ना अनेक घटनांमुळे पूर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांनी (Police) मोक्काअंतर्गत कारवाई सुरु केली आहे. त्याचबरोबर तडीपारीच्या कारवाया गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे तिथं दहशत पसरवणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या वर्षभरात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन (kolsepatil) हद्दीत एकूण 16 लोकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

गुंडांचा मुक्काम जेलमध्ये असणार हे नक्की !

गेल्या चार महिन्यात 5 जणांना तडीपार करण्यात आला आहे. तर वर्षभरात 8 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. सध्याची संघटित गुन्हेगारी पाहता आगामी काळात मोक्का आणि तडीपारीच्या कारवायांना देखील वेग येणार असल्याचे पोलिसांनी सूचित केले आहे. त्यामुळे आता खुलेआमपणे दहशत माजवली तर जास्त काळासाठी गुंडांचा मुक्काम जेलमध्ये असणार हे नक्की ! पोलिसांच्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दहशत माजवणाऱ्या अनेकांनी कल्याण शहरातून कारवाईच्या भीतीने पळ काढला आहे. ज्या परिसरातून पळ काढला, त्यांचा पोलिस विविध पद्धतीने शोध घेत आहे.

हे सुद्धा वाचा

चिथावणीखोर लोकांवर देखील विविध कलमानुसार…

कल्याण पूर्वेत तरुणाईचा गुन्हेगारीत जास्त समावेश असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यातही 18 ते 22 या वयोगटातील मुलांचं प्रमाण गुन्हेगारीत जास्त असल्याचं पोलीसांनी सांगीतलं आहे. सध्या तरुणांना लगेचं राग येतो अन् नंतर त्यातून गुन्हा घडतो, किंवा एखादा गुन्हा घडण्यासाठी अनेकदा चिथावणी देखील दिली जाते, अशा चिथावणीखोर लोकांवर देखील विविध कलमानुसार 107 प्रमाणे – 168, 110 प्रमाणे 31 तर 109 प्रमाणे 9 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलीचं कंबर कसली आहे. त्यामुळे कल्याणमधील गुन्हेगारी काही प्रमाणात का होईल कमी झाली आहे.