नवरा घरी आला, पत्नी आणि मुलगा बेशुद्धावस्थेत सापडले, नेमकं काय घडलं?

त्यांनी लगेच त्या तिघांना रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत पत्नी आणि मुलाने जीव सोडला होता. भाऊ बेशुद्धावस्थेत आहे.

नवरा घरी आला, पत्नी आणि मुलगा बेशुद्धावस्थेत सापडले, नेमकं काय घडलं?
बुलढाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 15, 2023 | 9:18 PM

मुंबई : भाईंदरमध्ये धक्कादायक घटना समोर आली. भाईंदर पश्चिमेच्या मोरवा गावात ही घटना समोर आली. राम चौहान हे रात्री घरी आहे. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण घरी पत्नी कविता, मुलगा रोहित आणि भाऊ श्याम हे तिघाही बेशुद्धावस्थेत दिसले. त्यांनी लगेच त्या तिघांना रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत पत्नी आणि मुलाने जीव सोडला होता. भाऊ बेशुद्धावस्थेत आहे.

आई -मुलाचा मृत्यू

भाईंदर पश्चिमेच्या मोरवा गावात आई आणि मुलाचा मृत्यू झाला. राहत्या घरी तीन जण बेशुध्द अवस्थेत आढळून आले होते. उपचारादरम्यान आई कविता चौहान (वय 27) आणि मुलगा रोहित चौहान (वय 8) यांचा मृत्यू झाला. तर दीर श्याम चौहान (वय 27) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

तिघांना बेशुद्धावस्थेत पाहिले

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. भाईंदर पोलिसांकडून तपास सुरू आहे. नवरा राम चौहान काल रात्री घरी आल्यावर तिघांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले होते. अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एम. बी. पाटील यांनी दिली.

 

नेमकं काय घडलं?

राम चौहान हे रात्री घरी आले. तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबातील तिघेही बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांनी तिघांना रुग्णालयात दाखल केले. पण, तोपर्यंत त्यांची पत्नी कविता चौहान आणि मुलगा रोहित चौहान यांनी प्राण सोडले होते. भावाचे प्राण वाचू शकले. त्यामुळे ते तिघे बेशुद्ध कसे झाले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us