
Monalisa Bhosle and Farman Khan Love Jihad: प्रयागराज कुंभमेळ्यातून एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेली मोनालिसा भोसले आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मोनालिसा हिने सर्वांच्या विरोधात जात, पोलिसांच्या सुरक्षेत मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खान याच्यासोबत लग्न केलं आहे. ज्यामुळे मोनालिसा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे… एकेकडे मोनालिसा हिच्या कुटुंबियांनी लग्नाबद्दल अनेक प्रश्व उपस्थित केले, तर दुसरीकडे आता सिनेविश्वातून देखील यासाठी विरोध होत आहे.दरम्यान, मोनालिसाचा डेब्यू सिनेमा ‘द डायरी ऑफ मणिपूर’चा दिग्दर्शक सनोज मिश्रा याचं वक्तव्य चर्चेत आलं असून, त्यामुळे हा मुद्दा आणखी वाढला आहे.
दिग्दर्शक सनोज मिश्रा याने लग्नाबद्दल अनेक गंभीर आरोप केले असून मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नाला ‘लव्ह जिहाद’चं नाव दिलं आहे. हे प्रकरण आता फक्त लग्नापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही. यामागे एका मोठ्या नेटवर्कचा कट असू शकतो… दिल्ली आणि मध्य प्रदेशातून कायम मुली गायब झाल्याच्या बातम्या समोर येत राहतात आणि याची खोल चौकशी झाली पाहिजे. सखोल चौकशी केल्यास यामध्ये केरळ सरकारने मोठी भूमिका बजावली असावी. सनातन धर्माला बदनाम करण्यात केरळ सरकार नेहमीच आघाडीवर राहिलें आहे. सीएए-विरोधी आंदोलनादरम्यान फरमान खान शाहीन बागमध्ये शरजील इमामसोबत अनेक वेळा दिसला होता.’
सनोज पुढे म्हणाला, ‘फरमान कोणताच अभिनेता नाही. त्याचा कोणताच सिनेमा प्रदर्शित झालेला नाही… फक्त पूजा होते आणि पोस्टर प्रदर्शित होतो… ‘, सनोज याने पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे, कारण हा भारतातील प्रत्येक मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.’ सध्या सनोज याने केलेल्या दाव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, मोनालिसा आणि फरमान यांचं लग्न आधिच कुटुंबिय आमि समाजात वादाचा विषय बनला आहे. भारतात यापूर्वीही अशा बाबींवरून वाद निर्माण झाले आहेत, विशेषतः जेव्हा त्यात धर्म आणि नातेसंबंधांचा संबंध येतो. यामुळेच हा मुद्दा आता वैयक्तिक न राहता, सामाजिक आणि राजकीय चर्चेचा एक भाग बनला आहे…. असं देखील अनेक जण म्हणत आहेत.