AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 3 महिन्यांत बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना टक्कर देणार ‘हे’ मराठी चित्रपट

कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला. मात्र आता हळूहळू का होईना यातून सावरण्याचा प्रयत्न मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीकडून (Bollywood) होत आहे. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला. याच काळात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनीही (Marathi Movies) त्यांना चांगली टक्कर दिली.

पुढील 3 महिन्यांत बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना टक्कर देणार 'हे' मराठी चित्रपट
Marathi MoviesImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 23, 2022 | 7:45 AM
Share

कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला. मात्र आता हळूहळू का होईना यातून सावरण्याचा प्रयत्न मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीकडून (Bollywood) होत आहे. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला. याच काळात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनीही (Marathi Movies) त्यांना चांगली टक्कर दिली. ‘झिम्मा’, ‘पावनखिंड’, ‘मी वसंतराव’ यांसारख्या आशयघन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. अजूनही बरेच मराठी चित्रपट हे प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. 22 एप्रिल रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ या प्रसाद ओकच्या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता आहे.

ऐतिहासिक कथानक असलेला आणखी एक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ असं या चित्रपटाचं नाव आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठीतला हा बिग बजेट चित्रपट आहे. दिग्दर्शक रवी जाधव हे अनन्या या गाजलेल्या नाटकावर आधारित ‘अनन्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. दिव्यांग मुलीची प्रेरणादायी कथा यात दाखवण्यात येणार आहे. याशिवाय अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘बालभारती’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले बॉलिवूड चित्रपट-

‘हिरोपंती 2’, ‘रनवे 34’, ‘जयेशभाई जोरदार’, ‘धाकड’, ‘पृथ्वीराज’, ‘शमशेरा’, ‘जुग जुग जियो’, ‘मेजर’, ‘भुलभुलैय्या 2’ हे बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले मराठी चित्रपट-

चंद्रमुखी, भारत माझा देश, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, इरसाल, अनन्या, समरेणू, एक होतं माळीण हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

हेही वाचा:

Malaika Arora: “आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला डेट केलं की..”; अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायका झाली व्यक्त

Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?