AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2023 : नवरात्रीत का केले आते सात्विक भोजन? असे आहे याचे महत्त्व

सात्विक अन्न खाल्ल्याने मन शुद्ध, स्वच्छ आणि उर्जेने परिपूर्ण होते. या आहाराचे पालन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सात्विक अन्नामध्ये विशेषतः कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश होतो.

Navratri 2023 : नवरात्रीत का केले आते सात्विक भोजन? असे आहे याचे महत्त्व
सात्विक भोजनImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 18, 2023 | 10:15 AM
Share

मुंबई : शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात झाली आहे. या काळात सात्विक अन्न ग्रहण करण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, या अन्नामध्ये फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, संपूर्ण धान्य यांचा समावेश होतो. त्यात तळलेले किंवा मसालेदार अन्न  नसते. सात्विक अन्न खाल्ल्याने मन शुद्ध, स्वच्छ आणि उर्जेने परिपूर्ण होते. या आहाराचे पालन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सात्विक अन्नामध्ये विशेषतः कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश होतो. ज्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स भरपूर असतात. हा आहार नियमितपणे पाळल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक गंभीर आजारांपासून दूर राहता येते. चला तर मग जाणून घेऊया सात्विक अन्नाचे फायदे.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

नवरात्रीमध्ये सात्विक अन्नामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासाठी नवरात्रीच्या उपवासात प्रथिनेयुक्त शेंगा आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते. याशिवाय फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे नैसर्गिकरित्या शरीराचे संरक्षण करतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त

सात्विक अन्नामध्ये लोकं अधिक हंगामी फळे आणि भाज्या खातात. ज्यामध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण कमी असते आणि कॅलरीजही कमी आढळतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सात्विक अन्न तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये कमी कॅलरी असलेले पदार्थ तुम्हाला मदत करू शकतात. तसेच, सात्विक अन्नात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ पोटभर राहतो आणि तुम्ही जास्त खाणे टाळता, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

शरीराला ऊर्जा देते

जर तुम्ही नियमितपणे सात्विक अन्न खाल्ले तर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. सात्विक आहाराचे नियम पाळल्यास थकवा आणि आळसाची समस्याही दूर होते.

शरीर डिटॉक्स करते

सात्विक अन्न खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या समस्या टाळू शकता. जर तुम्हाला सूज येणे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ येणे, थकवा येणे, पुरळ येणे इत्यादी समस्या असतील तर सात्विक अन्न जरूर खा, त्याचा फायदा होऊ शकतो. शरीर डिटॉक्स करण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि मध मिसळून प्या. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....