“If Modi returns” ने पाकिस्तानमध्ये खळबळ, निकालापूर्वीच धाकधूक वाढली?
नवी दिल्ली : भारतीय निवडणुकीची जेवढी उत्सुकता प्रत्येकामध्ये आहे, तेवढीच या निवडणुकीची चर्चा पाकिस्तानमध्येही आहे. कारण, गेल्या पाच वर्षांमध्ये भारत-पाकिस्तानचे संबंध ज्या प्रकारे राहिले, ते पाहता पाकिस्तानीमध्येही निवडणुकीविषयी उत्सुकता आहे. भारताने आंतरराष्ट्रायी संबंधांचा वापर करुन पाकिस्तानला एकटं पाडलंय, पाकिस्तानमध्ये महागाईने शिखर गाठलंय. त्यामुळे भारतात कुणाचं सरकार येतं त्याविषयी एक्झिट पोलनंतर चर्चा सुरु झाली. त्यातच “If […]
नवी दिल्ली : भारतीय निवडणुकीची जेवढी उत्सुकता प्रत्येकामध्ये आहे, तेवढीच या निवडणुकीची चर्चा पाकिस्तानमध्येही आहे. कारण, गेल्या पाच वर्षांमध्ये भारत-पाकिस्तानचे संबंध ज्या प्रकारे राहिले, ते पाहता पाकिस्तानीमध्येही निवडणुकीविषयी उत्सुकता आहे. भारताने आंतरराष्ट्रायी संबंधांचा वापर करुन पाकिस्तानला एकटं पाडलंय, पाकिस्तानमध्ये महागाईने शिखर गाठलंय. त्यामुळे भारतात कुणाचं सरकार येतं त्याविषयी एक्झिट पोलनंतर चर्चा सुरु झाली. त्यातच “If Modi returns” या अग्रलेखाने तर पाकिस्तानमध्ये खळबळ माजवली आहे.
पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनमध्ये एका संपादकीयमध्ये एक्झिट पोलनंतर विश्लेषण करण्यात आलंय. एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पाच वर्षांच्या कार्यकाळाकडे चालले आहेत. हिंदू राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर मोदी बहुमत मिळवू शकतात, असं या अग्रलेखात म्हटलंय.
“मोदी 2.0 मध्ये पाकिस्तानसोबतचा तणाव कमी होण्याची शक्यता दिसून येत नाही. मोदींचं सत्तेत पुनरागमन म्हणजे त्यांच्या पाकिस्तानकडून बदला घेण्याच्या धोरणाचंही पुनरागमन असेल. इम्रान खान यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, ज्याविषयी विश्लेषक आश्वस्त नाहीत. त्यामुळे मोदी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या कथित आक्रमक बचावाचं धोरण बदलतील की नाही?”, असा सवाल या अग्रलेखात करण्यात आलाय.
“If Modi returns” या नावाने हा अग्रलेख आहे. मोदी हे वाजपेयी नाहीत आणि त्यांची दोघांची तुलना करणं मोठी चूक असेल. मोदी हे दोन्ही देशांमध्ये समस्येचं निराकरण संवादातून सोडवण्याऐवजी ताकद दाखवून सोडवत आहेत. मोदी इम्रान खान यांच्या शांती संदेशाचं उत्तर देतील का? मोदी 2.0 पहिल्या कार्यकाळापेक्षा वेगळे असतील का?”, असंही
लेख में जाहिद हुसैन लिखते हैं, “मोदी वाजपेयी नहीं हैं और उन दोनों की तुलना करना बहुत बड़ी गलती होगी. मोदी दोनों देशों के बीच समस्याओं का समाधान बातचीत के बजाय शक्ति का इस्तेमाल करके निकालना चाहते हैं. क्या मोदी इमरान खान की शांति संदेश का सकारात्मक जवाब देंगे. क्या मोदी 2.0 अपने पहले कार्यकाल से अलग साबित होंगे?” असंही If Modi returns मध्ये म्हटलंय.