AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी का सोडले राजकारण, चाहत्याने दिलेल्या त्या कागदावर काय लिहिले होते

अमिताभ बच्चन यांनी गेल्या ५० वर्षात खूप मोठे नाव कमवले आहे. पण अभिनय करत असताना एककाळ असा देखील आला होता जेव्हा त्यांना यश मिळत नव्हते. सिनेमे फ्लॉप होत होते. त्या दरम्यान त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पण राजकारणातून फक्त तीनच वर्षात त्यांना सन्यास घेतला. काय होते त्यामागचे कारण जाणून घ्या.

अमिताभ बच्चन यांनी का सोडले राजकारण, चाहत्याने दिलेल्या त्या कागदावर काय लिहिले होते
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 08, 2024 | 4:56 PM
Share

Amitabh bachchan :  देशात सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत अनेक सेलिब्रिटी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण तुम्हाला माहितीये का की बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी देखील राजकारणात प्रवेश केला होता. पण नंतर त्यांना राजकारणातून माघार घेतली. काय आहे कारण जाणून घ्या.

81 वर्षीय अमिताभ बच्चन हे आज बॉलिवूडचे मोठे नाव आहे. आजही ते कोणतेही काम कोणत्याही तरुणाना लाजवेल इतक्या चपळाईने करतात. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना अभिनय क्षेत्रात अपयश येत होतं. त्यांचे चित्रपट चालत नव्हते. अशा वेळी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात ते सक्रिय झाले. बच्चन कुटुंबाचे गांधी कुटुंबाशी जुने संबंध आहेत. राजीव गांधी हे त्यांचे मित्र होते आणि ते त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले होते.

बोफोर्समुळे राजकारण सोडले?

8व्या लोकसभा निवडणुकीत अमिताभ बच्चन यांच्या बाजूने 68 टक्के मते घेत निवडणूक जिंकली होती. त्यानंतर बोफोर्स घोटाळ्यात अमिताभ यांचे नाव आले होते. त्यानंतर त्यांनी जुलै 1987 मध्ये राजकारणाला अलविदा केले. अमिताभ यांनी राजकारण सोडण्याचे हे एकमेव कारण नव्हते. आसाममध्ये एक छोटीशी घटना घडली होती. ज्याने अमिताभ बच्चन यांना विचार करायला भाग पाडले आणि त्यांनी राजकारण सोडले. याचा उल्लेख खुद्द अमिताभ यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये केला होता.

आसाममध्ये चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरावे लागले

अमिताभ बच्चन यांनी आसाममध्ये काँग्रेसचा प्रचार करताना चुकीच्या निर्णयामुळे त्यांचे हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरवावे लागल्याचे सांगितले होते. त्यानंतर पायलट आणि ते लगेच त्यातून बाहेर पडले. पण यादरम्यान, एका विद्यार्थी सुरक्षा कवच भेदून त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या हातात एक कागद दिला. ज्यावर काहीतरी लिहिले होते.

विद्यार्थ्याने दिलेल्या कागदावर काय लिहिले होते?

विद्यार्थ्याने बिग बी यांना दिलेल्या कागदावर लिहिले होते की, ‘बच्चन साहेब, मी तुमचा मोठा चाहता आहे, पण मी विरोधी पक्षासोबत आहे. कृपया हे राज्य सोडा. विद्यार्थ्याच्या या भावनिक आवाहनानंतर अमिताभ बच्चन यांना विचार करायला भाग पाडले. यामुळेच त्यांनी राजकारण सोडले.

सिमी गरेवालच्या शोमध्ये बोलताना अमिताभ यांनी राजकारण सोडण्यामागचं कारण सांगितले. ते म्हणाले की, मी राजकारणी नव्हतो आणि राजकारणात येण्याचा माझा निर्णय भावनिक होता. राजीव गांधी आणि आमचे कुटुंब मैत्रीपूर्ण होते, म्हणूनच मी मित्रासाठी राजकारणात प्रवेश केला. मी एक नवशिक्या होतो आणि त्याला पात्र नव्हतो. म्हणूनच मी अवघ्या तीन वर्षांत राजकारण सोडले.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?