अमेरिकेची भारताला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, भारत आमच्या निशाण्यावर म्हणत थेट..

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यामध्येच आता अमेरिकेतून भारताला मोठी धमकी देण्यात आली. या धमकीने चांगलीच खळबळ उडाली. भारताला याला काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

अमेरिकेची भारताला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, भारत आमच्या निशाण्यावर म्हणत थेट..
peter navarro and donald trump
| Updated on: Aug 14, 2026 | 5:44 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे आणि व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केले. त्यांनी दावा केला की, भारत एक गुप्त शिपमेंट नेटवर्कचा हिस्सा आहे. ज्याच्या माध्यमातून भारत मोठ्या संख्येने चीनचे साहित्य अमेरिकेचा टॅरिफ वाचवण्यासाठी पाठवत आहे. पीटर नवारोच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेला दरवर्षी 19 अरब डॉलर ते 26 अरब डॉलर नुकसान सहन करत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चीनहून येणारा माल. चीनचा माल तिसऱ्या देशातून अमेरिकेत येतो, कारण शुल्क वाचवण्यासाठी हे केले जाते, ज्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, चीनचे प्रोसेसिंग, री लेबलिंग आणि री पॅकेजिंग करून मुळ देश बदलले जातंय.

मुळात तो खरा देश चीन आहे. अमेरिकेचा टॅरिफ वाचवण्यासाठी असे केले जातंय. रिपोर्टनुसार 2018 च्या कम्युनिस्ट चीन 40 अधिक देशांना लॉन्डर सुविधा देण्यात आली. या गुप्त नेटवर्कमघ्ये अमेरिकेचे मोठे व्यापारी सहभागी आहेत. ज्यात भारत, मॅक्सिको, कॅनडा, युरोपिय संघ, कोरिया आणि जपान या देशांचा समावेश आहे. नवारो यांनी भारताला इशारा देत म्हटले की, भारत पूर्णपणे आमच्या टार्गेटवर आहे. रडार स्क्रीनवर भारत आहे.

भारताला थेट अमेरिकेकडून धमकी देण्यात आली. नवारो यांनी आरोप करत म्हटले की, भारत आणि काही देश नवीन टॅरिफपासून वाचण्यासाठी शेडो नेटवर्क तयार करत आहेत. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणाने भारत,चीन, स्लोवाकिया, हंगरी, आैर अजरबैजानला 100 टक्के टॅरिफ लागणार आहे.

भारतावर टीका करताना नवारो यांनी यापूर्वी भारताला टॅरिफचा महाराजा म्हटले होते. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारताला मोठी धमकी अमेरिकेकडून करण्यात आली. भारत हिट लिस्टवर असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. टॅरिफमुळे अगोदरच भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात आहेत. त्यामध्येच 100 टक्के टॅरिफ भारतावर कधीही लागू शकतो. त्यातच भारतावर हल्लाबोल अमेरिकेतून करण्यात आला. ज्यामुळे एकच मोठी खळबळ उडालीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us