
फळांनी जर दिवसाची सुरुवात केली तर शरीर हायड्रेटेड राहते. टरबूज आणि संत्रीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. दिवसाची सुरुवात जर या फळांनी केली तर शरीर हायड्रेटेड राहतं.

आरोग्यतज्ञांच्या मते सफरचंद, केळी, टरबूज, एवोकाडो, आंबा, अननस, चिक्कू अशी फळे सकाळी खायला हवेत. जाणून घेऊया यामागची कारणे काय आहेत.

फळांनी वजन कमी होतं. यात फायबर असल्यानं पचन चांगलं होतं. फळांनी पोट लवकर भरते त्यामुळे अर्थातच वजन कमी होतं. बरेचदा ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ते लोक फलाहार करतात.

फळांमध्ये साखर असते. साखर खाल्ली, गोड खाल्लं की शरीराला ऊर्जा मिळते. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते. ही शर्करा आपल्या शरीराचं चयापचय वेगवान करते. नाश्त्यात फळे खाल्ल्यावर शरीराला साखर मिळते आणि चांगली ऊर्जा सुद्धा मिळते.

फळांचे सेवन सकाळीच करावे. सकाळी फळे खाल्ल्याने दिवसभर एनर्जी जाणवते. दिवसाच्या इतर कुठल्याही वेळेपेक्षा सकाळीच नाश्त्यात फळे खाणं कधीही योग्य असतं. फळांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. उपाशी पोटी फळे खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदा होतो.