महाराष्ट्राचा वीरपुत्र निनाद मांडवगणे अनंतात विलीन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नाशिक : महाराष्ट्राचा वीरपुत्र स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे अनंतात विलीन झाले. नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी लष्करी इतमामात शहीद निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद निनाद मांडवगणे यांना अखेरचा सलाम करण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वायूसेनेचे कमांडर, कर्नल आणि […]

महाराष्ट्राचा वीरपुत्र निनाद मांडवगणे अनंतात विलीन
Follow us on

नाशिक : महाराष्ट्राचा वीरपुत्र स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे अनंतात विलीन झाले. नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी लष्करी इतमामात शहीद निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद निनाद मांडवगणे यांना अखेरचा सलाम करण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

वायूसेनेचे कमांडर, कर्नल आणि टॉप रँक अधिकाऱ्यांनी शहीद निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केलं. शहीद निनाद यांच्या पत्नी यांनी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह जेव्हा पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केलं, तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावले.

शहिदाच्या चिमुकलीला पाहून गोदाकाठ गहिवरला!

हेलिकॉप्टर दुर्घटनेत स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद

जम्मू-काश्मिरमधील बडगाम येथे भारतीय हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेत माहाराष्ट्रचा वीरपुत्र शहीद झाला आहे. नाशिकचे वैमानिक स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. निनाद मांडवगणे यांच्यासह आणखी सहा जवान या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याची माहिती देण्यात आली होती.

नाशिकचे स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हे औरंगबाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26 व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांची निवड पुण्यातील एनडीएत झाली आणि त्यानंतर ते 2009 साली हेलिकॉप्टरचे पायलट म्हणून हवाई दलात रुजू झाले. निनाद यांची पोस्टिंग सध्या श्रीनगरमध्ये होती. तिथेच झालेल्या या दुर्घटनेत निनाद यांना वीरमरण आले.

मंगळवारी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक केला. तेव्हापासूनच भारत आणि पाकिस्तानकडून सीमावर्ती भागांवर गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर आज पाकिस्तानने भरदिवसा भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, भारतीय वायुसेनेने पाकच्या विमानांना पळवून लावले. यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला आहे.