पुरावे मागण्यापेक्षा ‘जैश’वर कारवाई कर, घटस्फोटीत पत्नीने इम्रानला तोंडावर पाडलं

इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्याप्रकरणी (Pulwama Attack) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने भारताकडे पुराव्याची मागणी केली. मात्र इम्रानच्या घटस्फोटीत पत्नीनेच त्याला घरचा आहेर दाखवत, एकप्रकारे पुरावे दिले. इम्रान खान हे पाकिस्तानी सैन्याच्या हातचं बाहुलं असल्याचा घणाघात मेहर खानने केला. पुलवामा हल्ल्याप्रकरणी इम्रान खानने जे स्पष्टीकरण दिलं ते सैन्याच्याआदेशानेच दिल्याचा दावा रेहम खानने केला. सैन्याच्या आशिर्वादानेच इम्रान खान सत्तेत […]

पुरावे मागण्यापेक्षा 'जैश'वर कारवाई कर, घटस्फोटीत पत्नीने इम्रानला तोंडावर पाडलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्याप्रकरणी (Pulwama Attack) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने भारताकडे पुराव्याची मागणी केली. मात्र इम्रानच्या घटस्फोटीत पत्नीनेच त्याला घरचा आहेर दाखवत, एकप्रकारे पुरावे दिले. इम्रान खान हे पाकिस्तानी सैन्याच्या हातचं बाहुलं असल्याचा घणाघात मेहर खानने केला. पुलवामा हल्ल्याप्रकरणी इम्रान खानने जे स्पष्टीकरण दिलं ते सैन्याच्याआदेशानेच दिल्याचा दावा रेहम खानने केला. सैन्याच्या आशिर्वादानेच इम्रान खान सत्तेत आल्याचा हल्लाबोल रेहमने केला.

जैश ए मोहम्मद या संघटनेसोबत पाकिस्तान सरकारचा काही संबंध नसेलही, मात्र अशा संघटनांविरोधात काहीही कारवाई केलेली नाही, असं म्हणत रेहम खानने इम्रानला एकप्रकारे पुरावा दिला. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यासारख्या संघटनांवर आधीच कारवाई व्हायला हवी होती. जैशने तर पुलवामा हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे, असं ट्विट रेहम खानने केलं आहे.

इम्रान खान आपली विचारधारा आणि नीतीमूल्ये बाजूला ठेवून सत्तेत आला आहे. इम्रान खानने जे भाष्य केलं आहे, ते सैन्याच्या निर्देशानेच केलं आहे. लष्कराला जे हवं असतं, ते इम्रान खानकडून वदवून घेतलं जातं. निवडणुकांमध्ये अनेक दंगली घडवण्यात आल्या. दंगली झाल्या, त्याकडे इम्रान खानने डोळेझाक केली असा आरोप रेहम खानने केला.

इम्रान खानने पुलवामा हल्ल्याप्रकरणी मंगळवारी भारताला उद्देशून स्पष्टीकरण दिलं. पुरावे द्या आम्ही कारवाई करु, मात्र युद्ध केल्यास आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा इम्रान खानने भारताला दिला. त्यानंतर रेहम खानने इम्रानवर आगपाखड केली.

इम्रानला जे शिकवण्यात आलं, तसंच तो बोलत आहे. जर तो कारवाई करण्याचा दावा करत असेल, तर त्याने आधी ती कारवाई करुन दाखवावी. आमचा देश आर्थिक बाबतीत काळ्या यादीत जाण्याच्या मार्गावर आहे. हे काही पुलवामा हल्ल्यानंतर नाही, असं रेहम खान म्हणाली.

भारताला हवी म्हणून कारवाई करु नये, तर पाकिस्तानाच्या हितासाठी इम्रान खानने कारवाई करावी, असाही सल्ला रेहम खानने दिला. इम्रान खान कारवाईची भाषा करत असला तरी त्याने गेल्या सात महिन्यात कोणतंच पाऊल उचललं नाही. जैश ए मोहम्मद या संघटनेसोबत पाकिस्तान सरकारचा काही संबंध नसेलही, मात्र अशा संघटनांविरोधात काहीही कारवाई केलेली नाही, असं म्हणत रेहम खानने इम्रानला आरसा दाखवला.

कोण आहे रेहम खान? रेहम खान पाकिस्तानातील पत्रकार आहे. रेहम खान मूळची पाकिस्तानची आहे, मात्र पहिल्या लग्नानंतर ती ब्रिटनमध्ये रहात होती. रेहमनं पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर इम्रान खानशी निकाह केला होता. पहिल्या पतीपासून तिला तीन मुलं आहेत. बीबीसीवर ‘साऊथ टूडे’ हा प्रादेशिक कार्यक्रम आणि हवामानाचा अंदाज सादर करण्याची रेहमची जबाबदारी होती. इम्राननंही त्याची पहिली पत्नी जेमिमा खानपासून 2004 साली घटस्फोट घेतला होता. त्या दोघांनाही दोन मुलं आहेत. या घटस्फोटानंतर इम्रान-रेहमचा निकाह झाला. दहा महिन्यानंतर त्यांचा तलाख झाला.

इम्रान-रेहमचा दहा महिन्यात काडीमोड

टीव्ही अँकर असलेल्या रेहम खान आणि इम्रान खान यांचा 2015 मध्ये निकाह झाला होता. त्यावेळी इम्रान खान 62 तर रेहम खान 41 वर्षांची होती. मात्र अवघ्या 10 महिन्यात दोघांनी काडीमोड घेतला होता. इम्रान खानचं हे दुसरं लग्न होतं.

याआधी इम्रानने इंग्लंडमधील जेमिमा गोल्डस्मिथसोबत लग्नही केलं होतं. मात्र, 9 वर्षाच्या संसारानंतर हे लग्न जून 2004 मध्ये मोडलं होतं. रेहमने देखील याआधी एक लग्न केलं होतं. रेहमला तीन मुलं सुद्धा आहेत. बीबीसीमधील नोकरी सोडून रेहम पाकिस्तानमध्ये परतली होती.

रेहमसोबत काडीमोड झाल्यानंतर इम्रानने 2018 मध्ये तिसरं लग्न केलं. इम्रानने 40 वर्षीय बुशरा मनेकाशी निकाह केला. बुशरा यांना दोन मुलं आणि तीन मुली आहेत.

इम्रान खान काय म्हणाला?

“पुलवामा हल्ल्याप्रकरणी भारत सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तान सरकारवर आरोप केले. आम्ही स्थैर्याकडे जात असताना, हल्ला कशाला करु. पुरावे द्या कारवाईची आम्ही हमी देतो. हल्ला करुन पाकिस्तानला काय मिळेल? काश्मीरमधील हल्ल्यांना दोष देण्यापेक्षा तो प्रश्न सोडवू. तुम्ही युद्ध केलं तर ते युद्ध आम्ही संपवू”, असा इशारा इम्रान खान यांनी दिला. आम्हाला माहित आहे युद्ध सुरु करणं सोपं असतं, मात्र युद्ध सुरु करणं माणसांच्या हातात असतं, युद्ध थांबवणं माणसांच्या हातात नसतं. तुमचं निवडणुकीचं वर्ष आहे, जर तुम्ही समजत असाल की पाकिस्तानवर हल्ला करु, तर पाकिस्तानही विचार करणार नाही, उत्तर देईल, असा इशारा इम्रान खान यांनी दिला.

संबंधित बातम्या 

इम्रान खान किती पुरावे हवे? भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे!   

पुरावे द्या, कारवाई करु, पण युद्ध केल्यास उत्तर देऊ: इम्रान खान

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.