AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शीतपेयाच्या कंपनीत दारुची निर्मिती, आयुर्वेदिक कंपनीतील फंडा पाहून अधिकारी चक्रावले

Jalgaon Crime News: जळगाव येथील मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट या कंपनीत शीतपेय बनविण्याचा उद्योग दाखवला. परंतु शीतपेयाच्या नावाखाली बनावट देशीदारू बनवून त्याची बाजारात बेकायदेशीररित्या विक्री होत होती.

शीतपेयाच्या कंपनीत दारुची निर्मिती, आयुर्वेदिक कंपनीतील फंडा पाहून अधिकारी चक्रावले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 04, 2024 | 12:00 PM
Share

उन्हाळ्यात शीत पेयांना चांगली मागणी असते. यामुळे शीत पेय बनवणाऱ्या कंपन्यांची उलाढाल या काळात चांगली होती. परंतु जळगावात वेगळीच घटना घडली. जळगावातील एमआयडीसीत एक आयुर्वेदिक कंपनी आहे. या कंपनीत शीतपेयाचे उत्पादन होत असल्याचे म्हटले जात होते. परंतु कंपनीत शीतपेयाच्या नावाखाली बनावट देशीदारू बनविण्याचा कारखाना सुरु झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती मिळाली. या प्रकाराने अधिकारीही चक्रावले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजता छापा टाकून अंदाजे ५० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ५ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मंदार आयुर्वेदिकमध्ये असे ‘उद्योग’

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुकीचा फायदा घेत एमआयडीसी भागात असलेल्या के-१० येथील मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट या कंपनीत शीतपेय बनविण्याचा उद्योग दाखवला. परंतु शीतपेयाच्या नावाखाली बनावट देशीदारू बनवून त्याची बाजारात बेकायदेशीररित्या विक्री होत होती. याबाबत गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने शनिवारी ४ मे रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास मंदार आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीत छापा टाकला.

कर्मचाऱ्यांनी दार बंद केले, पण…

दरम्यान, पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आतून दार बंद करून घेतले होते. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत बनावट देशीदारू बनवण्याचा कारखाना उध्वस्त केला. या ठिकाणी दारू पॅकिंगसाठी लागणारे रिकामी बॉटल्स, 32 बॅरेल तयार असलेली दारू, मशीनरी सामान आणि ५ जणांना पोलिसांनी घेतले आहे. हा मुद्देमाल जवळपास ५० लाखाहून अधिक असल्याचे समोर आले आली आहे.

दरम्यान या ठिकाणाहून बनावट देशीदारू हा कोणत्या ठिकाणी गेला आहे, त्या ठिकाणाची देखील चौकशी करून जिल्ह्यात वितरण करण्यात आलेला मुद्देमाल मागवण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहेत. या प्रकरणात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?