AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरावे द्या, कारवाई करु, पण युद्ध केल्यास उत्तर देऊ: इम्रान खान

इस्लामाबाद: जम्मू काश्मीरमधील पुलवामा (Pulwama attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर छी थू होत आहे. त्यानंतर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “माझं वक्तव्य भारत सरकारसाठी आहे. भारत सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तान सरकारवर आरोप केले. आम्ही स्थैर्याकडे जात असताना, हल्ला कशाला करु. पुरावे […]

पुरावे द्या, कारवाई करु, पण युद्ध केल्यास उत्तर देऊ: इम्रान खान
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

इस्लामाबाद: जम्मू काश्मीरमधील पुलवामा (Pulwama attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर छी थू होत आहे. त्यानंतर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

“माझं वक्तव्य भारत सरकारसाठी आहे. भारत सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तान सरकारवर आरोप केले. आम्ही स्थैर्याकडे जात असताना, हल्ला कशाला करु. पुरावे द्या कारवाईची आम्ही हमी देतो. हल्ला करुन पाकिस्तानला काय मिळेल? काश्मीरमधील हल्ल्यांना दोष देण्यापेक्षा तो प्रश्न सोडवू”, असं भावनिक आवाहन इम्रान खान यांनी केलं.

आम्ही दहशतवादाला थार देतोय, याचे पुरावे द्या, मग कारवाईची हमी देतो. आम्ही स्थैर्याकडे जातोय, मग हल्ला का करु? पुलवामा हल्ला करुन आम्हाला काय फायदा आहे? – इम्रान खान

भारतात सध्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे पुलवामाचा मुद्दा उचलून तुम्हाला फायदा होईल. मात्र तुम्ही युद्ध केलं तर ते युद्ध आम्ही संपवू, असा इशारा इम्रान खान यांनी दिल

पाकिस्तानचा बदला घ्यायला पाहिजे, असं मी वारंवार ऐकतोय, पण जगातील कोणता कायदा लोकांना अशाप्रकारे न्यायाधीश बनवण्याचा अधिकार देतो? असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला.

आम्हाला माहित आहे युद्ध सुरु करणं सोपं असतं, मात्र युद्ध सुरु करणं माणसांच्या हातात असतं, युद्ध थांबवणं माणसांच्या हातात नसतं. तुमचं निवडणुकीचं वर्ष आहे, जर तुम्ही समजत असाल की पाकिस्तानवर हल्ला करु, तर पाकिस्तानही विचार करणार नाही, उत्तर देईल, असा इशारा इम्रान खान यांनी दिला.

काश्मीरमधील तरुण अशा टोकाला का गेले आहेत, जिथे त्यांना जीवाचीही पर्वा नाही, भारताने याबाबत विचार करायला हवा, असं इम्रान खान म्हणाले. मिलिट्री हा पर्याय नाही. जोरजबरदस्तीने काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही. चर्चा हाच त्याला पर्याय आहे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 17 वर्षांपासून धगधग आहे, तिथे मिलिट्री काहीही करु शकली नाही, त्यामुळे काश्मीरच्या शांततेसाठी मिलिट्री हा पर्याय असू शकत नाही असं इम्रान खान यांनी नमूद केलं.

दहशतावीद हल्ल्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला आहे.जवळपास 70 हजार पाकिस्तानी नागरिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत. शिवाय 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. त्यामुळे पाकिस्तानला दोष देणं बंद करा, असं इम्रान खान म्हणाले.

VIDEO:

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.