भारत – न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 फायनल सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. स्थानिक चाहते भारताच्या विजयासाठी आशावादी असून, ईशान किशन, संजू सॅमसंग, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहेत. प्रथम फलंदाजी करून मोठा स्कोअर उभारणे हे विजयासाठी महत्त्वाचे ठरू शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.
आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 फायनल सामना रंगणार आहे, ज्यासाठी देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. नागपुरातील स्थानिक क्रिकेटप्रेमी आणि काही खेळाडूंनी या सामन्याबद्दल आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सर्वांनाच भारतीय संघ जिंकेल अशी खात्री आहे.
अनेकांच्या मते, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केल्यास मोठा स्कोअर उभारून प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणता येईल. आजच्या सामन्यात ईशान किशन, संजू सॅमसंग, हार्दिक पांड्या यांच्याकडून फलंदाजीत, तर जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांच्याकडून गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे. न्यूझीलंडचा संघ मजबूत असला तरी, भारतीय संघाचा फॉर्म आणि खेळाडूंचा आत्मविश्वास पाहता विजय भारताचाच होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. सकाळपासूनच मॅच सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी

