Vidarbha Flood Photos | विदर्भात पुराचं थैमान, नागरिक बेहाल, मदतीसाठी एनडीआरएफ दाखल
विदर्भात पूराने थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. घरात पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
Follow us
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gosekhurd Dam Door Open) पावसामुळे पाण्याची प्रचंड आवक झाली आहे. धरणातून आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक विसर्ग झाला आहे. त्यामुळे पूरस्थिती तयार झाली आहे.
वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील पिपंळगाव (भों) गावात पाणी शिरले आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोसेखुर्द धरणाचे पाणी वेगाने वैनगंगा नदीत येत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या 10 गावांना महापुराने वेढले आहे.
यातील लाडज, चिखलगाव, बेलगाव, बेटाळा, पिंपळगाव या गावांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
विदर्भात पूरपरिस्थितीत देखील पावसाचा जोर वाढताच आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरफच्या 4 तुकड्या पुण्यातून विदर्भात दाखल झाल्या आहेत.
गोसीखुद धरणाचे 33 दरवाजे उघडल्याने धरणातून 30257 पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगज, अहेरी सिरोंचा या चार तालुक्यांना अलर्ट देण्यात आला आहे. या भागात हजारो हेक्टर शेतीला पुराचा फटका बसला आहे.
गडचिरोली जिल्ह्याला तिसरऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. 10 दिवसांपूर्वी आलेल्या पुराचे आतापर्यंत पंचनामे सुध्दा करण्यात आले नाही, तोच आता पुन्हा एकदा गडचिरोलीला पुराने वेढले आहे.
वायू दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना एयरलिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तो अयशस्वी ठरला आहे.