AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सवयींमुळे दारिद्र्य येईल, ‘हे’ नियम पाळल्यास घरात लक्ष्मी नांदेल

सूर्योदयानंतर उठल्याने, घरातील जुन्या चपला, जुने कपडे किंवा घरातील नळ किंवा टाकीतून टपकणारे पाणी, अशा छोट्या-छोट्या गोष्टी देखील घरात दारिद्र्य यायला कारणीभूत ठरू शकतात. तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असावा, असं वाटत असेल तर काय करावे आणि काय टाळावे, याविषयी जाणून घ्या.

‘या’ सवयींमुळे दारिद्र्य येईल, ‘हे’ नियम पाळल्यास घरात लक्ष्मी नांदेल
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Nov 29, 2024 | 8:05 PM
Share

तुम्ही खूप कष्ट करतात, मेहनत घेतात पण तरीही तुमची आर्थिक परिस्थिती वर्षानुवर्ष नाजुकच रहाते, असं का होत असेल? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुदोष हे व्यक्तीच्या जीवनातील संकटे आणि दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे तुमच्या घरातील छोट्या-छोट्या चुका देखील तुमच्या आर्थिक प्रगतीमधील बाधा ठरू शकतात.

हिंदू धर्मात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच लोक घर बांधण्यापासून ते घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी वास्तु आणि ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात.

वास्तु आणि ज्योतिषशास्त्रात असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम रोज पाळले पाहिजेत. बरेच लोक कष्ट करूनही गरीब राहतात आणि विचार करतात की असे का होते. पण चिंता करू नका. यावर आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कोणत्या चुकांमुळे घरात दारिद्र्य येऊ शकते जाणून घ्या.

घरात दारिद्र्य येण्याची 5 कारणे कोणती?

ब्रह्म मुहूर्तात न उठणे

ज्योतिष आणि वास्तुनुसार सूर्योदयाच्या वेळी किंवा ब्रह्म मुहूर्तापूर्वी उठणे शुभ मानले जाते. ब्रह्म मुहूर्तात उठल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि गृही लक्ष्मीचा वास होतो. असे मानले जाते की, सूर्योदयानंतर उठल्याने घरात दारिद्र्य येते, म्हणून नेहमी ब्रह्म मुहूर्तात उठले पाहिजे.

गुरुवारी केस किंवा नखे कापणे

काही लोक गुरुवार आणि एकादशीला केस आणि नखे कापतात. वास्तुशास्त्रानुसार असं करणं अशुभ मानलं जातं. गुरुवारी केस किंवा नखे कापल्याने देवी लक्ष्मी निघून जाते आणि व्यक्तीला दारिद्र्याला सामोरे जावे लागते.

घरात पाणी टपकणे

घरातील नळ किंवा टाकीतून टपकणारे पाणी अशुभ मानले जाते. घरात पाणी साचल्याने आर्थिक संकट निर्माण होते. याशिवाय सदोष इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवू नयेत. घरात वाईट किंवा जुन्या गोष्टी ठेवल्याने पैशांचे नुकसान होते. त्यामुळे घरातलं भंगार आधी रिकामं करा.

तुटलेले शूज आणि चप्पल घरात ठेवणे

तुटलेले शूज किंवा चप्पल घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तुटलेले शूज आणि चप्पल घरात ठेवू नयेत. याशिवाय फाटलेले आणि जुने कपडे घरात ठेवणेही अशुभ मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. घरातील जुने शूज आणि चप्पल तुम्ही कोणालाही दान करू शकता.

पूजा न करणे

हिंदू धर्मात पूजा, नामजप आणि उपवासाला खूप महत्त्व आहे. पण जर तुम्ही तुमच्या घरात पूजा किंवा व्रत करत नसाल तर अशा घरात देवी लक्ष्मीचा वास होत नाही, ज्यामुळे आर्थिक अडचणी सुरू होतात. यामुळे त्या व्यक्तीला दारिद्र्याला सामोरे जावे लागू शकते.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत