
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आज लागला. संपूर्ण देशाच लक्ष या निकालाकडे लागलं होतं. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयए कोर्टाने हा निकाल दिला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. पण आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
“आज जो निकाल आला, तो डोळ्यात धूळफेक करणारा निर्णय आहे. एवढा मोठा स्फोट झाला. 6 लोक शहीद झाले, 100 लोक जखमी झाले. लोकांना मोठा धक्का बसला. हेमंत करकरे साहेबांनी एवढी मेहनत करुन या लोकांना अटक केली. पुरावे गोळा केले. एवढ सर्व असताना या आरोपींची सुटका झाली, हे समजण्यापलीकडे आहे. हे गुन्हेगार नसतील तर सरकार 17 वर्ष झोपलं होतं का?. आरोपींना का अटक केली नाही?. आम्ही न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाणार. न्याय मिळावा अशी आमची भावना आहे” असं जमात-ए-उलेमाचे जिल्हाध्यक्ष कासिम म्हणाले.
7 जणांवर याप्रकरणी आरोप
न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याबद्दल काय म्हटलं?
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट अढळला न्हवता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या दोन वर्ष आधी साध्वी प्रज्ञा सन्यासी बनल्या. भौतिक संपत्तीपासून त्या लांब होत्या असं कोर्टाने म्हटलय. मालेगावमध्ये स्फोट झाला हे फिर्यादी पक्षाने सिद्ध केलं. पण घटनास्थळी सापडलेल्या मोटरसायकलवरच तो बॉम्ब ठेवलेला होता हे सिद्ध करता आलं नाही असं कोर्टाने म्हटलय.