मालेगाव बॉम्ब स्फोट
29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. मशिदीजवळ उभ्या असलेल्या एका मोटारसायकलला स्फोटके बांधून हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. हा स्फोट रमजानच्या काळात लोक नमाजासाठी जात असताना झाला होता. ऑक्टोबर 2008 मध्ये महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2009 मध्ये या प्रकरणाची चौकशी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे (NIA) सोपवण्यात आली. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना जामीन दिला. NIA ने या प्रकरणात दिलेल्या अंतिम युक्तिवादात म्हटले होते की, कटकर्त्यांनी मालेगाव स्फोटाची कटकारस्थान मुस्लिम समाजातील काही लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, आवश्यक सेवा विस्कळीत करण्यासाठी, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि राज्याच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी रचले होते.
मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांची पुण्यात जंगी मिरवणूक
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी १७ वर्षांनंतर सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले गेले आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंह आणि इतर आरोपींचा मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने निर्दोष मुक्त केले. पुण्यात परतल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Aug 3, 2025
- 1:38 pm
मालेगाव प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; ‘मोदी-योगी’ यांचे नाव, साध्वीच्या आरोपांनी एकच खळबळ, काय होता तो ‘प्लॅन’?
Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात एक खळबळजनक दावा आता समोर आला आहे. संशयाच्या आधारावर निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हा दावा केला आहे. त्यावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 3, 2025
- 8:46 am
साध्वी प्रज्ञा सिंह यांची निर्दोष सुटल्यावर पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या, हिंदू दहशतवादाच्या जन्मदात्याचं…
मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा भगवा आणि सनातन धर्माचा विजय आहे असे त्या म्हणाल्या. त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाची जनक काँग्रेससह सर्व धर्मद्रोही बदनाम झाले आहेत, असे त्यांनी नमूद केलं.
- manasi mande
- Updated on: Aug 2, 2025
- 10:55 am
‘खुद अपना कत्ल कर लेती…’, मालेगाव निकालानंतर जावेद अख्तरांची विचार करायला लावणारी पोस्ट
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल जाहीर झाल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी निकालावर नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 1, 2025
- 3:13 pm
Malegaon Bomb Blast : ‘या’ एका कारणामुळंच मालेगाव स्फोटाचे सर्व आरोपी निर्दोष, 17 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?
१७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए कोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांसह सर्व सात आरोपींना पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त केले. कोर्टाने स्फोटासाठी वापरलेल्या बाईकबाबत आणि आरोपींच्या सहभागासंबंधी पुरेसे पुरावे सापडले नाहीत, असे निरीक्षण नोंदवले. पीडित कुटुंबांनी मात्र या निकालाविरोधात हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Aug 1, 2025
- 3:01 pm
मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर पोलीस सतर्क, सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पोलिस प्रशासन सतर्क आहे. 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर शहरात शांतता आहे, तरीही अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर देखील लक्ष ठेवले आहे.
- manasi mande
- Updated on: Aug 1, 2025
- 1:12 pm
Malegaon Blast Case : मालेगाव स्फोटप्रकरणात मोहन भागवतांना अटक करण्याचे होते आदेश, माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. काल हा निकाल सुनावण्यात आला. यानंतर, या स्फोटाच्या तपासात सहभागी असलेल्या माजी एटीएस अधिकाऱ्याने काही मोठे धक्कादायक दावे केले आहेत.
- manasi mande
- Updated on: Aug 1, 2025
- 10:40 am
सनातनी दहशतवाद म्हणा, पण भगवा शब्द..; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी विशेष एनआयए न्यायालयात झाली असून त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Jul 31, 2025
- 7:06 pm
भगवा नव्हे, सनातनी दहशतवाद म्हणा… पृथ्वीबाबांनी फोडलं वादाला तोंड; आणखी काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच हा निकाल म्हणजे गृह विभागाचे अपयश असल्याचेही चव्हाण म्हणाले.
- Prajwal Dhage
- Updated on: Jul 31, 2025
- 5:43 pm
काँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी – CM फडणवीस
मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आज विशेष NIA न्यायालयाने निकाल दिला. आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jul 31, 2025
- 3:22 pm
जाणूनबुजून निकृष्ट तपास केला..; असदुद्दीन ओवैसींचा सरकारवर निशाणा
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला या निकालाविरुद्ध अपील करण्याची मागणी केली आहे. ओवैसी यांनी एनआयएच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या प्रकरणातील न्याय मिळवण्यासाठी पुढील पाऊले उचलण्याची मागणी केली आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Jul 31, 2025
- 3:21 pm
Nitesh Rane : …त्यांच्या तोंडावर चपराक, पुन्हा कुणीही हिंमत करू नये, मालेगाव बॉम्बस्फोट निकाल येताच नितेश राणेंचा घणाघात
आतंकवादाला ताकद देणे आणि जिहादला ताकद देणं हे विरोधकांचे सुरू होतं. ज्यांनी ज्यांनी यांची बदनामी केली, त्यांनी नाक रगडून माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नितेश राणेंनी केली.
- Harshada Shinkar
- Updated on: Jul 31, 2025
- 3:04 pm
खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल, तर.. ; इम्तियाज जलील यांचं मोठं विधान
मालेगावच्या २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरसह सर्व सात आरोपींना पुराव्यांच्या अभावामुळे निर्दोष मुक्त केले आहे. एनआयएने मृत्युदंडाची मागणी केली होती, परंतु न्यायाधीशांनी सर्व आरोपींना निर्दोष ठरवले. या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची पुनर्विचारणी करण्याची मागणी केली जात आहे. न्याय मिळवण्यासाठी जात, धर्म आणि राजकारणाचा विचार सोडून देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले जात आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Jul 31, 2025
- 2:39 pm
Malegaon Blast 2008 : कोठडीत अपमान, मारहाण… 17 वर्षात पहिल्यांदा मी आनंदी… कोर्टासमोर साध्वी प्रज्ञासिंह यांना कोसळलं रडू
२००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. १७ वर्षे चाललेल्या या खटल्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींवर आरोप सिद्ध झाले नाहीत. .
- Harshada Shinkar
- Updated on: Jul 31, 2025
- 2:15 pm
Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर RSS प्रमुखांची तीन शब्दात प्रतिक्रिया
Malegaon Blast Case : आज 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाला आला आहे. त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची प्रतिक्रिया आली आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Jul 31, 2025
- 2:00 pm