अभिजीत दिपके अॅक्शन मोडमध्ये, थेट झारखंडमध्ये व्हिडिओ कॉल, आंदोलनाबाबत मोठं विधान

Abhijit Dipke : झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

अभिजीत दिपके अॅक्शन मोडमध्ये, थेट झारखंडमध्ये व्हिडिओ कॉल, आंदोलनाबाबत मोठं विधान
Abhijit Dipke on Jharkhand Protest
Image Credit source: Google
| Updated on: Aug 11, 2026 | 9:20 PM

झारखंडमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. एका अत्यंत वेदनादायक घटनेत, विद्यार्थी नेते महतो जे नऊ दिवसांच्या शांततापूर्ण उपोषणामुळे आधीच शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते त्यांच्यावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

अभिजीत दिपके आणि देवेंद्र नाथ महातो यांच्यात चर्चा

रुग्णालयाच्या खाटेवरून प्रचंड वेदनेत बोलताना, महतो यांनी दिपके यांना त्या भयानक क्षणांची माहिती दिली जेव्हा पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ला केला. हे एक कडू सत्य आहे कि ज्या माणसाने शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग निवडला, त्याला अशा क्रूर शारीरिक हिंसेला सामोरे जावे लागले. उपोषणामुळे आधीच थकलेल्या शरीरावर झालेल्या या लाठीचार्जमुळे त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांची प्रकृती अचानक जीवाला धोका निर्माण होणाऱ्या पातळीवर पोहोचली.

काय म्हणाले दिपके?

शासनाच्या या दडपशाहीबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही आंदोलनांना चिरडण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्याच्या वृत्तीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. दिपके म्हणाले, “नवी दिल्लीतील जंतरमंतर असो वा झारखंडचे रस्ते, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशी अमानुष आणि क्रूर पोलीस दडपशाही करणे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे.’

विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही – दिपके

पुढे बोलताना दिपके म्हणाले की, ‘देवेंद्र भाई हे खरे नायक आहेत, जे विद्यार्थी वर्गासाठी स्वतःचा जीव पणाला लावत आहेत. सीजेपी त्यांच्या या न्याय्य लढ्यात खंबीरपणे पाठीशी उभी आहे. आम्ही त्यांच्या विलक्षण धैर्याला, चिकाटीला आणि शक्तीला सलाम करतो.’ सीजेपीने पोलिसांच्या या मनमानी कारभाराची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारी दडपशाही किंवा शारीरिक बळाचा वापर करून युवक आणि विद्यार्थी वर्गाचा आवाज दाबता येणार नाही, याचा पुनरुच्चार सीजेपीने केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us