6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…

Anna Hajare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावर अण्णा हजारे यांनी टीका केली आहे.

6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा...
Anna Hajare on 6 MP
Image Credit source: Google
| Updated on: Jun 22, 2026 | 7:56 PM

राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षांतरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अण्णा हजारेंची खासदारांवर टीका

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत, याबाबत प्रश्न विचारला असता अण्णा हजारे यांनी म्हटले की, अशा पद्धतीने पक्ष बदल करणे योग्य नाही. श्रद्धा, निष्ठा आणि ध्येयवाद नसल्यामुळेच दल बदल होतो. समाजासाठी काम करण्याची भूमिका असलेले नेते पक्ष बदलत नाहीत. स्वतःचे हित साधण्यासाठीच अनेकजण पक्षांतर करतात, असा आरोपही हजारे यांनी केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

6 खासदारांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘शिवसेना हे कुटुंब आहे. परिवार आहे. खऱ्या शिवसेना परिवारात, बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेना परिवारात कट्टर शिवसैनिक खासदार सामील झाले आहेत. त्यांचं मी पक्षात स्वागत करतो. चार वर्षापूर्वी 22 जून 2022 रोजी शिवसेनेने आम्ही उठाव केला होता. तेव्हा 40 आमदार सुरुवातीला आले. त्यानंतर पुन्हा चौकार नाही, षटकार मारलेला आहे. सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला. हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. हिंदुत्वाच्या विचाराचा आहे.’

एकनाश शिंदे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘शिवसेनेचा विचार तिथे शिवसैनिक. म्हणून या सहा खासदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत, खऱ्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. काही लोकं मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या आरोप प्रत्यारोप करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, मी सर्वांचा मान सन्मान राखेल, तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवेल, आपण कुटुंब म्हणून पुढची वाटचाल करू.’

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us